शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार; नेत्यांकडून आश्वासन - पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:33 AM

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली ...

ठळक मुद्देपक्षांतर्गत गट-तट बाजूला ठेवून आम्ही ताकदीने लढविणारस्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यातील अन्य जागा देण्याबाबत चर्चा

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही ताकदीने लढविणार आहोत, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, माझ्यासह विशाल पाटील, प्रतीक पाटील यांचीही नावे प्रदेश व केंद्रीय कार्यकारिणीसमोर इच्छुक म्हणून आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी पक्षाकडून कोण इच्छुक नसल्याची चर्चा चुकीची आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामील करून घेतले आहे. खा. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा जागेची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिली आहे. मात्र वर्ध्याची जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते सहमत नाहीत. त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितली आहे. काँग्रेस कार्यकर्ते याच गोष्टीवरून नाराज झाले असून, जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास लेखी विरोध पक्षाकडे केला आहे.

खा. शेट्टी यांच्याशी प्रकाश आवाडे व आ. विश्वजित कदम यांनी चर्चा केली होती. सध्या अकोला अथवा शिर्डी येथील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. मात्र अद्याप यावर चर्चा झालेली नाही.सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी दिल्ली व मुंबईत जाऊन नेत्यांकडे प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल. मी स्वत: इच्छुक आहे. विशाल पाटील लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर तशी मागणी केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत. मोदी लाट ओसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण आहे. भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास ही जागा पुन्हा ताब्यात घेऊ, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

एकसंधपणाने निवडणुकीचे नियोजनउमेदवारीसाठी रस्सीखेच होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे आता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी पक्षाने एकदा उमेदवार जाहीर केला की काँग्रेसमधील सर्व नेते, कार्यकर्ते एकसंधपणे काम करतील. त्याबाबतचा विश्वासही आम्ही केंद्रीय व राज्यातील नेत्यांसमोर व्यक्त केला आहे. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रितपणे नियोजन केले होते, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक