शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 6:39 PM

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती, सहनशील असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. नेमकी याचीच प्रचिती देत सांगली येथील ख्यातनाम दिवंगत उद्योजक गणपतराव आरवाडे यांची नात म्हणून मेघना कोरे यांनी शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा उमटविताना विचारांचा वारसाही जपला आहे.

ठळक मुद्देसांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती, सहनशील असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. नेमकी याचीच प्रचिती देत सांगली येथील ख्यातनाम दिवंगत उद्योजक गणपतराव आरवाडे यांची नात म्हणून मेघना कोरे यांनी शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा उमटविताना विचारांचा वारसाही जपला आहे.सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय अशा विविधांगी क्षेत्रांच्या बीजारोपणातून तयार झालेल्या कुटुंबात मेघना कोरे यांचा जन्म झाला. आजोबा गणपतराव आरवाडे हे मोठे उद्योजक आणि दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे, त्यांच्या विचारांच्या छायेत रमण्याचे आणि थोरामोठ्यांच्या सहवासात दरवळणाऱ्या घरातील वैचारिक सुगंधाचा अनुभव घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.त्यांच्या आजोबांनी ६० च्या दशकात महावीर आॅईल मिल सुरू केली. महावीर ब्रँडच्या खाद्यतेलाला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटकातही मोठी मागणी होती. त्याच काळात त्यांनी हळद पावडरीचा कारखानाही सुरू केला. वडील श्रीकांत यांनी आजोबांचा व्याप सांभाळला. वयाच्या १८ व्या वर्षीच गणपतराव आरवाडे यांचा सहवास सुटला.

आजोबा गेल्यानंतर वडील व मेघनातार्इंच्या मोठ्या भावाने हा व्यवसाय उत्तमरित्या चालविला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याचवर्षी भावाचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यामुळे वडील श्रीकांत खचले. त्यांनी हळद कारखाना, आॅईल मिलची जबाबदारी मेघनातार्इंवर सोपविली.लहानपणीच मिळालेले बाळकडू घेऊन मेघना यांचा प्रवास सुरू झाला. कितीही श्रीमंती लाभली तरी, पाय जमिनीवर ठेवून जगायचे, हा मूलमंत्र त्यांनी जपला आणि यशाची अनेक शिखरे सर करीत त्या पुढे गेल्या.मेघना यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीच्या इम्यॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण ग. रा. पुरोहित कन्या शाळेत झाले. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईला गेल्या. तेथे त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले. शिक्षणाचे अनेक महत्त्वाचे टप्पे त्यांनी पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय  व्यापार या विषयाचेही त्यांनी शिक्षण घेतले आहे. कधी विज्ञान, कधी वाणिज्य, तर कधी कलेच्या शाखांना स्पर्श करीत त्यांनी शिक्षणातही अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे.पहिल्यांदा हळद कारखान्यात अत्याधुनिक यंत्रणा बसवली. त्याकाळी हळद कारखाने कामगारांचे संप व मंदीच्या विळख्यात अडकले होते. पण उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर मेघनातार्इंनी कामगारांचा प्रश्न सोडविला. आता सांगलीची हळद दुबईच्या बाजारपेठेत दिमाखात वावरते. त्यामागे मेघनातार्इंचे परिश्रम कारणीभूत आहेत.

मेघनाताई व्यवसाय वाढविण्यात मग्न असतानाच, त्यांचे पती राजीव कोरे यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या बांधकाम व्यवसायाचीही जबाबदारी मेघनातार्इंवर पडली. पण ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली.

आज सांगली, मुंबई या दोन्ही ठिकाणचा व्यवसाय त्या समर्थपणे सांभाळत आहेत. सर्व व्यवसाय आॅनलाईनशी जोडले आहेत. एक महिला म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करताना त्यांनी, त्यांच्या आयुष्याची इमारत ज्या सामाजिक आणि वैचारिक पायावर उभी आहे, त्याचा कधीही विसर पडू दिला नाही. हाच पाया त्यांना यशाची शिखरे चढताना फायद्याचा ठरला.मेघनातार्इंनी वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्धार केला. पण त्या काळी खासगीकरणातून हा प्रकल्प उभारण्याची सरकारदरबारी तरतूदच नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेकदा मंत्रालयाच्या चकरा मारल्या. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यातून सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या सेंटरची उभारणी केली.अनेक उद्योगांची उभारणीसांगलीच्या उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अध्वर्यू गणपतराव आरवाडे यांची नात व उद्योजक श्रीकांत आरवाडे यांची कन्या मेघनातार्इंनी उद्योगाचा डोलारा केवळ सांभाळलाच नाही, तर कालानुरुप त्यात बदल करून तो वाढविला. एमआरके ग्रुपअंतर्गत दौलत इंडस्ट्रिजमधून मेघनाताई हळद देश-विदेशात एक्स्पोर्ट करतात.

 

महावीर ब्रँडच्या खाद्यतेलाचा कारखाना आहे. सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रोजेक्ट, कृपा कंटेनर्सअंतर्गत बॅरेल बनविण्याचा कारखाना, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स अशा अनेक उद्योगांची त्यांनी उभारणी केली. सांगलीतील आरवाडे हायस्कूल, यंगमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे.शीतल पाटील, सांगली

टॅग्स :Navratriनवरात्रीSangliसांगली