शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सांगलीत घरफोड्यांची मालिका सुरूच; : नागरिकांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:38 IST

सांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे.

ठळक मुद्देवाटमारीतून खुनाचीही घटना, पोलिसांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ पथके नावालाच उरली आहेत.नाकाबंदी, गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग आॅपरेशन या कारवाया बंद

सचिन लाडसांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे. रात्रीच्यावेळी एकट्याला गाठून चाकूच्या धाकाने लुटले जात आहे. अशातच लूटमारीतून एकाचा खून झाला. तरीही या वाढत्या गुन्'ांना आळा घालण्यात पोलिस अपयशी ठरल्याने सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी या गुन्'ांनी कळस गाठला असताना, भरीस भर म्हणून घरफोडी व वाटमारीच्या गुन्'ांचा आलेख वाढत आहे. अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. यातच चोºया व लूटमारीच्या घटना दररोज घडू लागल्याने, पोलिस आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सोहेल शर्मा यांनी ‘बेसिक पोलिसिंगवर’ भर देणार असल्याचे सांगितले. त्यांना कार्यभार घेऊन अजून आठ दिवसांचाही कालावधी झालेला नाही.

ज्यादिवशी त्यांनी कार्यभार घेतला, त्याचदिवशी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाटमारीतून एकाचा खून झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एका अल्पवयीन संशयितासह तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर २४ तासात यातील अल्पवयीन संशयित बालसुधारगृहातून पळून गेला. जाताना त्याने आणखी चार अल्पवयीन गुन्हेगारांनाही सोबत नेले. त्यांचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही.

गेल्या महिन्यापासून नाकाबंदी बंद आहे. बीट मार्शल पथके नुसती कागदावरच दिसत आहेत. रात्रीची गस्त वाढविल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. जर गस्त सुरु असेल, तर मग लूटमारीच्या घटना का घडत आहेत? अत्यंत गजबजलेल्या वखारभागातून गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या हॉटेल कामगाराचे लूटमारीच्या उद्देशातून अपहरण करुन त्याचा खून केला. याप्रकरणी नितीन जाधव या रिक्षाचालकासह तिघांना अटक केली.

हा खून केल्यानंतर आरोपींनी घरी जाऊन अंघोळ केली व पुन्हा सांगलीत येऊन त्यांनी दुसरा लूटमारीचा गुन्हा केला. रस्त्यावर पोलिसच दिसत नसल्याने गुन्हेगार खुलेआम गुन्हे करीत आहेत. पोलिसांची भीती आणि दरारा पूर्णपणे कमी झाला आहे. सामान्य माणसाला आज सुरक्षेची भावना वाटत नसल्याचे चित्र आहे. बसस्थानक, कोल्हापूर रस्ता, गोकुळनगर, शिंदे मळ्यातील रेल्वे ब्रीज ही ठिकाणे लूटमारीसाठी प्रसिद्ध ठरत आहेत.जुन्या पोलिसांवर विश्वास नाहीसहा महिन्यांपूर्वी सांगली शहर, संजयनगर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या अधिकाºयांचे खांदेपालट झाले. नवे अधिकारी लाभले. परंतु त्यांना अजून शहराची माहिती झाली का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या दिमतीला सहाय्यक अधिकारी व ‘डीबी’चे पथक आहे. तरीही वाढत्या घरफोडी व वाटमारीच्या गुन्'ांना ते आळा घालू शकले नाहीत. या तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांत ‘अर्धा’ डझन खून झाले आहेत. जुने पोलिसांचे अजूनही ‘खबºयांचे’ नेटवर्क आहे; पण सध्याचे अधिकारी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाहीत. परिणामी जुने पोलिस मिळेल ती ड्युटी करून सेवानिवृत्तीच्या तारखेकडे डोळे लावून आहेत.पथके कागदावरच!विशेष पथक, गुंडाविरोधी पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही घरफोडी, चेनस्नॅचिक व वाटमारीतील गुन्हेगारांपुढे हात टेकले असल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात अनेक दिग्गज व जुन्या कर्मचाºयांचा अजूनही भरणा आहे. त्यांना शहराची व गुन्हेगारांची माहिती आहे. तरीही घडलेला एक गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले नाही. मटका व दारू जप्त करण्याशिवाय ते काहीच करीत नाही. गुंडाविरोधी पथक दोन महिन्यांपासून कोमात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पिस्तूल तस्करीच्या तपासानंतर अदृश्य झाला आहे. पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ पथके नावालाच उरली आहेत.कारवाया बंदनाकाबंदी, गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग आॅपरेशन या कारवाया बंद झाल्याने गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. बसस्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडा बाजारात मोबाईल, दागिने लंपास होत आहेत. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस आहेत का नाहीत? ते करतात तरी काय? असा सवाल होत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली