शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

नदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:26 IST

देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्देनदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?

सांंगली : देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.साखळकर म्हणाले, ४० कोटी खर्चून शेरीनाला शुद्धीकरण योजना राबविली. पण ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. शेरीनाल्यासह शहराचे सर्व सांडपाणी सरकारी घाटापासून पुढे थेट नदीपात्रात मिसळते. महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पंचनामा करून महापालिकेला नोटीसही बजावली. तरीही महापालिकेने काहीच केले नाही. आजही लाखो लिटर सांडपाणी खुलेआम नदीत मिसळत आहे. महापालिकेने शेरीनाल्याचे सांडपाणी पुढे नदीकाठी नाल्याद्वारे उचलून नदीतच सोडले आहे. नदीत आता पाणीपातळी कमी असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे.ते म्हणाले, एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबवायचे नाटक केले जाते. गणपती विसर्जन, निर्माल्यामुळे प्रदूषण होते, म्हणून त्यासाठी उपक्रम राबविला जातो. मात्र दुसरीकडे शेरीनाल्याचे, ड्रेनेजचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी स्वच्छ होते का? नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत, मात्र पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे सुशोभिकरण मात्र जोरात सुरू आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेवर फौजदारी दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साखळकर यांनी केली.

टॅग्स :pollutionप्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली