शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

राज्याच्या राजकारणातला सांगलीचा दबदबा संपला, प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:16 IST

जिल्ह्याकडे एकही मंत्रिपद नाही

सांगली : कधी काळी पाच-सहा लाल दिव्यांच्या गाड्या, महत्त्वाची मंत्रिपदे मिरवत राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवणाऱ्या सांगली जिल्ह्याला आता पदांसाठी जोहार करावा लागत आहे. सध्या एकही मंत्रिपद नसलेल्या सांगली जिल्ह्याकडे प्रमुखपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद होते. त्या पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी मंगळवारी दिल्यानंतर जिल्ह्याकडे आता एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदे जिल्ह्यातील नेत्यांनी भूषविली आहेत. याशिवाय केंद्रातील कोळसा, क्रीडा या खात्याची राज्यमंत्री पदाची संधीही जिल्ह्याला मिळाली. दिवंगत नेते वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील या नेत्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे मिळवली. केंद्रात प्रतीक पाटील यांनी बराच काळ राज्यमंत्रिपद भूषविले. कधीकाळी राज्यातील चार व केंद्रातील एक अशी पाच मंत्रिपदे जिल्ह्याकडे होती. काँग्रेस तसेच आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा दबदबा अधिक होता.भाजप व महायुतीच्या काळात जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ सुरू झाला. बऱ्याच मागणीनंतर आमदार सुरेश खाडे व सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदे देण्यात आली. मात्र, २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या महायुतीच्या सत्ताकाळात एकही मंत्रिपद जिल्ह्याला मिळाले नाही.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून दबदबाराज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असेपर्यंत जयंत पाटील यांच्या माध्यमातून राजकारणात जिल्ह्याचे अस्तित्व दिसत होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षीय राजकारणातील जिल्ह्याचे अस्तित्वही घटले आहे.

यांनी भूषविले प्रदेशाध्यक्षपदेदिवंगत वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, प्रा. शरद पाटील, संभाजी पवार, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम, आदी नेत्यांनीही प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले होते. आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रमुख पक्षांचे एकही प्रदेशाध्यक्षपद जिल्ह्याकडे नाही.

मंत्रिपदाचा दुष्काळ कायमभाजपचे चार, शिंदेसेनेचे १ असे सत्ताधारी महायुतीचे पाच आमदार जिल्ह्यात निवडून आल्यानंतरही मंत्रिपदाचा दुष्काळ जिल्ह्याला सोसावा लागत आहे. सत्तेत असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षांतील राज्यस्तरीय पदेही जिल्ह्याला मिळालेली नाहीत.