शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सांगलीकरांनी पाणी बिलाचे ५८ कोटी रुपये थकविले, महापालिकेसमोर वसुलीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:26 IST

गेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही

शीतल पाटीलसांगली : महापालिकेकडून तीन शहरातील ८८ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो; पण यापैकी केवळ ३३ हजार नागरिकच पाणी बिल वेळेवर भरतात. यंदा ५५ हजार नागरिकांनी तब्बल ५८ कोटी रुपयांचे बिल थकविले आहे. त्याचा ताण महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहेत.कोरोनामुळे महापालिकेने दोन वर्षे पाणी बिले दिली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा बोजा वाढला आहे. त्यात गतवर्षीची बिलेही अद्याप नागरिकांना मिळालेली नाहीत. परिणामी पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. त्यात पाणी बिलातील घोटाळाही समोर आला होता. त्यामुळे पाणीपुरवठा विभागालाच शुद्धतेची गरज भासू लागली आहे. आयुक्त सुनील पवार, नितीन शिंदे यांच्याकडून थकबाकी वसुलीची अपेक्षा आहे.

शहरात नळ कनेक्शन किती?सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात महापालिकेकडून ८८ हजार ६४१ जणांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.

वर्षाची पाणीपट्टी किती?महापालिकेची एकूण पाणीपट्टी ६२ कोटी १९ लाख इतकी आहे. यात सांगलीची ४३ कोटी तर मिरज-कुपवाडची १८ कोटी आहे.

वर्षभरात ३३ हजार जणांनी ८ कोटी भरलेगेल्या वर्षभरात तीनही शहरातील नळ कनेक्शनधारकांकडून ७ कोटी ६२ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे.

५५ हजार जणांनी ५८ कोटी थकविले

शहरातील ६६ हजार जणांनी अद्याप पाणी बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ५८ कोटी ६८ लाख १२ हजार २७४ रुपयांची थकबाकी आहे.

वर्षभरात एकावरही कारवाई नाहीगेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही. गतवर्षीची बिले जुलै महिन्यात दिली होती.

थकबाकीदारांवर काय कारवाई करणार?महापालिकेकडून थकबाकीदारांना पाणी बिल वसुलीसाठी नोटिसा बजाविल्या जातात. त्यानंतर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई होते.काय कारवाई करणार?नागरिकांना लवकरच पाणी बिलाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तशी तयारी महापालिकेकडून सुरू आहे.

थकीतांवर नजरपाणीपट्टीच्या बिलांचे वाटप झाल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी पथके नियुक्त करू. यंदा थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न आहे. - नितीन शिंदे, कर निर्धारक

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी