शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सांगलीत नगरसेवकाचे शोलेस्टाईल आंदोलन, महापालिकेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:34 IST

पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीत नगरसेवकाचे शोलेस्टाईल आंदोलनमहापालिकेचा निषेधगुलाब कॉलनी परिसरात अपुरा पाणीपुरवठा गळती, स्वच्छतेच्या कामावरून अपुरा पुरवठा : उपाध्ये

सांगली :  पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना घेरावही घालण्यात आला. अखेर येत्या चार दिवसांत या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सांगली शहरातील गुलाब कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, रामकृष्ण परमहंस सोसायटी या परिसरात गेल्या सात दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.गुलाब कॉलनीतील पाण्याच्या टाक्यावर नगरसेवक गवळी व नागरिक चढले. तब्बल दोन तास घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये आंदोलनस्थळी आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरण्याची विनंतीही फेटाळली. अखेर उपाध्ये स्वत:च पाण्याच्या टाकीवर चढले. तिथे नगरसेवक गवळी व नागरिकांची समजूत काढून त्यांना खाली आणले.याबाबत राजू गवळी म्हणाले की, गेल्या सात दिवसांपासून या परिसरात पाण्याचा पुरवठा खंडीत झाला आहे. महापालिकेचे उपअभियंता संजय धर्माधिकारी यांना वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. धर्माधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यानेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. कार्यकारी अभिंयता उपाध्ये यांनी चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे. त्यानंतरही पाणी आले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

गळती, स्वच्छतेच्या कामावरून अपुरा पुरवठा : उपाध्येमहापालिकेने हिराबाग, जलभवन येथील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हिराबाग येथील दुरुस्तीचे काम १९ तास चालले. त्यानंतर नदीकाठावरील जॅकवेलच्या वाहिनीला गळती लागली. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे गुलाब कॉलनीतील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही.

महापालिकेने संप व पंपातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे काही भागात अपुरा पुरवठा होत आहे. तर काही भागात पाणीच गेलेले नाही. अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. संजय धर्माधिकारी यांनी या परिसरातील पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना समज दिली जाईल, असे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीWaterपाणी