शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी,सुधारण्याची संधी द्या : विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:45 IST

सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.सोमवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय ...

ठळक मुद्देअनिकेत कोथळे प्रकरण गंभीरच; सांगलीत नागरिकांशी संवादतुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. मोर्चे, रास्ता रोको करण्यासाठी जसा दबाव ग्रुप तयार करता, पोलिसप्रमुख कमी बोलतात आणि काम चांगले करून दाखवितात.

सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

सोमवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या नागरिकांच्या बैठकीत नांगरे-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून पोलिसांच्या कामाबद्दल तक्रारी ऐकून घेतल्या. महिलांची छेडछाड, वाढत्या घरफोड्या, लुटमार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांनी केली. वाहतूक व्यवस्थेविषयी तक्रारी केल्या. एकूण ४७ तक्रारी मांडण्यात आल्या. या सर्व तक्रारींची नांगरे-पाटील यांनी नोंद करुन घेतली.

नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस ठाण्यात येणाºया नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, ही बाब गंभीर आहे. येणाºया प्रत्येक तक्रारीची ठाणे अंमलदाराने दखल घेतलीच पाहिजे. पोलिस ठाणे हे तक्रारींचे निवारण करणारे चांगले सर्व्हिस सेंटर झाले पाहिजे. अनिकेत कोथळे प्रकरणातही तक्रार घेण्यास टाळाटाळ झाली. पुढे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. ३ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेचा लकी बॅग्जचा मालक नीलेश खत्रीशी वाद झाला. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. ५ नोव्हेंबरला कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यास लुबाडण्यात आले. पहाटे पाचला गायकवाड तक्रार देण्यास गेले; परंतु पोलिसांनी सकाळी साडेनऊला तक्रार घेतल्याचे दिसून आले आहे. पोलिस यंत्रणेतील हे दोष सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रसंगी ठाणे अंमलदार व त्याच्या मदतनीसाला प्रशिक्षण दिले जाईल.

नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात. अनिकेत कोथळे प्रकरणात घडलेली चूक फार गंभीर आहे. सांगलीकरांनी आमची ही चूक पोटात घेऊन सुधारण्याची संधी द्यावी. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. मोर्चे, रास्ता रोको करण्यासाठी जसा दबाव ग्रुप तयार करता, तसा पोलिसांना पाठिंबा देण्यासाठीही ग्रुप करावा. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. आणखी दीड महिन्याने पोलिसप्रमुख अशीच बैठक घेतील. पोलिसप्रमुख कमी बोलतात आणि काम चांगले करून दाखवितात.

या बैठकीस माजी आमदार हाफिज धत्तुरे, चेतना वैद्य, डॉ. नॅथालियन ससे, अरुण दांडेकर, विद्या नलवडे, सुधीर सिंहासने, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, राजू नरवाडकर, मौलाना शेख, सचिन सव्वाखंडे, सुरेश दुधगावकर, असिफ बावा, डॉ. विकास पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.‘एलसीबी’वर नांगरे-पाटील यांची नाराजीबैठकीनंतर नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाची आहे; पण गेल्या वर्षभरात त्यांनी केवळ एकच घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ‘चेन स्नॅचिंग’चे नऊ गुन्हे उघडकीस आणल्याने या गुन्ह्यांना आळा बसला आहे. वाटमारीचे गुन्हे रोखण्याचे आदेशही दिले आहेत. गुन्हेगारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही.‘सीआयडी’वर विश्वास ठेवा : नांगरे-पाटीलनांगरे-पाटील म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी तपासावर लक्ष ठेवून आहेत. तपास चांगल्या पद्धतीने होईल. कोणत्याही त्रुटी ते ठेवणार नाहीत. सांगलीकरांनी तपासावर विश्वास ठेवावा.जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करू : सुहेल शर्माजिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा म्हणाले, पोलिस ठाण्यात न्याय मिळत नाही, तक्रारींची दखल घेतली जात नाही, सन्मानाची वागणूक मिळत नाही, याबद्दल मांडलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. प्रत्येक समस्येचे लवकरच निवारण केले जाईल. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करुन दाखविले जाईल.बोगस तक्रार पाठवून चौकशीनांगरे-पाटील म्हणाले, पोलिस ठाण्यात तक्रारींची दखल घेतली जाते का नाही, हे पाहण्यासाठी आता पोलिस ठाण्यात बोगस तक्रारदार पाठवून चौकशी केली जाईल. यापूर्वी हा प्रयोग केला आहे. यामध्ये तीन तक्रारी आढळून आल्या. संबंधित पोलिसांवर खातेनिहाय कारवाईही केली आहे. आमच्यातील चुका शोधून त्या सुधारल्या जातील.

टॅग्स :SangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे