शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सांगली जिल्हा परिषद गट बदलणार, संख्या पुन्हा ६० वर जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:51 IST

सांगली : महाविकास आघाडीने घेतलेला जिल्हा परिषद गट रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द ...

सांगली : महाविकास आघाडीने घेतलेला जिल्हा परिषद गट रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ असेल. सांगली जिल्हा परिषदेची गटसंख्या ६० ते ६१, तर पंचायत समिती गणसंख्या १२० ते १२२ होणार असून, नव्याने रचना होणार आहे. आटपाडीचा गट व गण रद्द होऊन करंजे (ता. खानापूर) गट व गण वाढणार आहे.महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५, जास्तीत जास्त ८५ केली होती. त्या निर्णयानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची, तर पंचायत समितीच्या १३६ गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आरक्षणाची सोडतही झाली होती. त्यामुळे इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला होता. मात्र, आता शासनाच्या निर्णयाने इच्छेवर पाणी फिरले आहे.नव्या निर्णयानुसार गटसंख्या कमीत-कमी ५० आणि जास्तीत-जास्त ७५ झाली आहे. पूर्वीची सर्व गट आणि गणांची रचना रद्द होऊन ती नव्याने लोकसंख्येनुसार करण्यात येणार आहे. आटपाडी शहर नगरपंचायत झाली आहे. आटपाडी तालुक्याची एक लाख ३८ हजार ४५५ लोकसंख्या असून, २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चार गट आणि आठ गण होते. आता आटपाडी शहरासाठी नगरपंचायत झाल्यामुळे ती लोकसंख्या कमी होणार आहे. परिणामी जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन गण कमी होणार आहेत. यातूनही फेररचनेत लोकसंख्येचा विचार करून चार गट आणि आठ गण जैसे थे राहू शकतील. पण, नवीन गट आणि गणांच्या पुनर्रचनेत नाव बदलले जाणार आहे.

खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे खानापूर तालुक्यात एक गट आणि दोन गण कमी झाले होते. आधी तेथे तीन गट आणि सहा गण होते. नव्या रचनेत करंजे जिल्हा परिषद गट आणि दोन गणही वाढणार आहेत. उर्वरित आठ तालुक्यांत मात्र पूर्वीप्रमाणेच गट आणि गणांची संख्या असणार आहे.

गटाची रचना ८५ ते ५५ ऐवजी ७५ ते ५० प्रमाणेराज्य सरकारने राज्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमीत-कमी ५० आणि सर्वाधिक मोठ्या जिल्हा परिषदेत सदस्य संख्या ७५ निश्चित केली आहे. या सूत्रानुसार सांगली जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार ६० ते ६१ जिल्हा परिषद सदस्य, तर १२० ते १२२ पंचायत समिती सदस्य असतील. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून गट आणि गणांची रचना बदलली जाणार आहे.

अशी असणार गट आणि गणांची संख्यातालुका   -   गट -   गणआटपाडी - ३ ते ४ - ६ ते ८खानापूर  -  ०४   -  ०८पलूस - ०४  - ०८कडेगाव - ०४  - ०८वाळवा - ११ - २२मिरज - ११ - २२शिराळा - ०४ - ०८तासगाव - ०६ - १२क.महांकाळ - ०४ - ०८जत   - ०९ - १८एकूण - ६१ - १२२

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद