शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद गट बदलणार, संख्या पुन्हा ६० वर जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:51 IST

सांगली : महाविकास आघाडीने घेतलेला जिल्हा परिषद गट रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द ...

सांगली : महाविकास आघाडीने घेतलेला जिल्हा परिषद गट रचनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ असेल. सांगली जिल्हा परिषदेची गटसंख्या ६० ते ६१, तर पंचायत समिती गणसंख्या १२० ते १२२ होणार असून, नव्याने रचना होणार आहे. आटपाडीचा गट व गण रद्द होऊन करंजे (ता. खानापूर) गट व गण वाढणार आहे.महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५, जास्तीत जास्त ८५ केली होती. त्या निर्णयानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची, तर पंचायत समितीच्या १३६ गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आरक्षणाची सोडतही झाली होती. त्यामुळे इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला होता. मात्र, आता शासनाच्या निर्णयाने इच्छेवर पाणी फिरले आहे.नव्या निर्णयानुसार गटसंख्या कमीत-कमी ५० आणि जास्तीत-जास्त ७५ झाली आहे. पूर्वीची सर्व गट आणि गणांची रचना रद्द होऊन ती नव्याने लोकसंख्येनुसार करण्यात येणार आहे. आटपाडी शहर नगरपंचायत झाली आहे. आटपाडी तालुक्याची एक लाख ३८ हजार ४५५ लोकसंख्या असून, २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चार गट आणि आठ गण होते. आता आटपाडी शहरासाठी नगरपंचायत झाल्यामुळे ती लोकसंख्या कमी होणार आहे. परिणामी जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन गण कमी होणार आहेत. यातूनही फेररचनेत लोकसंख्येचा विचार करून चार गट आणि आठ गण जैसे थे राहू शकतील. पण, नवीन गट आणि गणांच्या पुनर्रचनेत नाव बदलले जाणार आहे.

खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे खानापूर तालुक्यात एक गट आणि दोन गण कमी झाले होते. आधी तेथे तीन गट आणि सहा गण होते. नव्या रचनेत करंजे जिल्हा परिषद गट आणि दोन गणही वाढणार आहेत. उर्वरित आठ तालुक्यांत मात्र पूर्वीप्रमाणेच गट आणि गणांची संख्या असणार आहे.

गटाची रचना ८५ ते ५५ ऐवजी ७५ ते ५० प्रमाणेराज्य सरकारने राज्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमीत-कमी ५० आणि सर्वाधिक मोठ्या जिल्हा परिषदेत सदस्य संख्या ७५ निश्चित केली आहे. या सूत्रानुसार सांगली जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार ६० ते ६१ जिल्हा परिषद सदस्य, तर १२० ते १२२ पंचायत समिती सदस्य असतील. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून गट आणि गणांची रचना बदलली जाणार आहे.

अशी असणार गट आणि गणांची संख्यातालुका   -   गट -   गणआटपाडी - ३ ते ४ - ६ ते ८खानापूर  -  ०४   -  ०८पलूस - ०४  - ०८कडेगाव - ०४  - ०८वाळवा - ११ - २२मिरज - ११ - २२शिराळा - ०४ - ०८तासगाव - ०६ - १२क.महांकाळ - ०४ - ०८जत   - ०९ - १८एकूण - ६१ - १२२

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद