शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

सांगलीवर होते राजीव गांधी यांचे विशेष प्रेम--चार वेळा भेट

By admin | Updated: May 20, 2016 23:40 IST

दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते; दौरा रद्द झाल्याची --स्मृतिदिन विशेषखंतही होती--राजीव गांधी

अविनाश कोळी -- सांगली --वसंतदादांच्या माध्यमातून राजीव गांधी यांचे सांगलीशी नाते जुळले. दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते सर्वपरिचित झाले. याच प्रेमापोटी त्यांनी एकदा-दोनदा नव्हे, तर चारवेळा सांगलीला भेट दिली. याशिवाय एक दौरा रद्द झाल्याची खंतही त्यांच्या मनात दीर्घकाळ राहिली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार?, हा प्रश्न निर्माण झाला. वसंतदादा त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते. दादांनी दिल्लीत गेल्यानंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली व पंतप्रधान पदाची सूत्रे राजीव गांधी यांना सोपविण्याची सूचना केली. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांना विनंती केली. राष्ट्रपतींनी त्याचदिवशी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. वसंतदादांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या या प्रेमापोटी राजीव गांधी यांनीही त्यांच्या घराण्यास भरभरून प्रेम दिले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचारासाठी राजीव गांधी दौरे करीत होते. त्यावेळी २0 फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांची सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयासमोरील मोकळ्या मैदानावर सभा झाली होती. ही सभा खूप गाजली. सभेला झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून राजीव गांधी भारावून गेले होते. त्यानंतर सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर धनगर समाजाच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते. त्यावेळी शिवाजीराव शेंडगे पालकमंत्री होते. राजीव गांधी यांना घोंगडे भेट देऊन त्यांच्या गळ्यात ढोलही अडकविला होता. या सत्कारानेही ते भारावून गेले होते. वसंतदादांची प्रकृती ठीक नव्हती, त्यावेळी मुंबईत रुग्णालयामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी दादांच्या स्नुषा शैलजाभाभी पाटीलही उपस्थित होत्या. रुग्णालयाच्या खोलीत त्यावेळी तिघेच उपस्थित होते. वसंतदादांचे निधन झाल्यानंतर शासकीय ‘प्रोटोकॉल’ डावलून ते सांगलीत उपस्थित झाले होते. दादांच्या पश्चात त्यांनी प्रकाशबापू पाटील यांच्यावरही तितकेच प्रेम केले. प्रकाशबापू आणि त्यांचे नाते नागपुरात अधिक घट्ट झाले. पंतप्रधान होण्यापूर्वीची ही गोष्ट होती. त्यावेळी पक्षाच्या एका कार्यक्रमानिमित्त राजीव गांधी नागपुरात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये थोडा दंगा झाल्यानंतर तातडीने राजीव गांधी प्रकाशबापूंना घेऊन तिथून निघाले. नागपुरात त्यावेळी एकाच खोलीत प्रकाशबापू व ते राहिले होते. त्यानंतर प्रत्येकवेळी प्रकाशबापूंची ते आपुलकीने चौकशी करीत असत. दादांच्या पश्चात वसंतदादा कारखान्याच्या आवारात दादांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण करण्याकरिताही राजीव गांधी शरद पवारांसोबत आले होते. कार्यक्रमानंतर ज्यावेळी कारखान्याच्या कार्यस्थळावर ते भोजनासाठी आले, त्यावेळी अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. राजीव गांधी यांना अक्षरश: उचलून वाहनापर्यंत आणण्यात आले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी प्रकाशबापूंना पुण्यापर्यंत येण्याची विनंती केली. मात्र बापूंना त्रास होईल म्हणून त्यांनी पुन्हा तो बेत रद्द केला. प्रकाशबापूंचे पुत्र माजी मंत्री प्रतीक पाटील, प्रकाशबापूंच्या पत्नी शैलजाभाभी पाटील, तसेच त्यांच्या मुलीसोबतही त्यांनी अनेकदा वार्तालाप केला होता. या सर्वांसोबत त्यांनी छायाचित्रही काढले होते. कोल्हापुरात एकदा त्यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा झाली होती. त्याचदिवशी सायंकाळी सांगलीत सभा होणार होती. मात्र जोरदार पावसाने ही सभा रद्द झाली. प्रकाशबापूंच्या प्रचारासाठी जाता आले नसल्याची खंत त्यांनी त्यानंतर अनेकदा व्यक्त केली होती. अशा अनेक आठवणींच्या माध्यमातून राजीव गांधी सांगलीशी जोडले गेले आहेत. वंदन इस जनता को करो!सांगलीत १९८४ च्या सभेत सुरुवातीला विधानसभेचे उमेदवार विठ्ठलदाजी पाटील यांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना रोखले आणि म्हणाले, ‘वंदन मुझे मत करो, करना है तो इस प्यारी जनता को करो.’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.