शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:38 IST

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत

ठळक मुद्देदादांच्या वारसांवर टीका; जतमध्ये कार्यक्रम

जत : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत सहकार व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केली.जत तालुका लायन्स क्लबच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व उल्लेखनीय काम केलेल्या पतसंस्थाचालकांचा सत्कार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. हे क्लेशकारक आहे. पुस्तकातील ज्ञानासोबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवहारातील ज्ञान शिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय संध्या संकटात आहे. शेतकरी समृद्ध झाला, तर राष्ट्र वैभवशाली होईल.

आमदार विलासराव जगताप म्हणाले की, समाजात चांगल्या शिक्षकांची वानवा असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ऱ्हास होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले की, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून समाजात काम करणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षणाची हमी हा शासनाचा धाडसी निर्णय आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी प्रास्ताविक केले. गोपाल बजाज यांनी मनोगत व्यक्त केले. बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद महास्वामी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, दिनकर पतंगे, आप्पासाहेब नामद, डॉ. भरत हेशी, डॉ. विद्याधर किट्टद, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, राजू आरळी, रेणुका आरळी, बसवराज बिराजदार, अ‍ॅड. श्रीपाद आष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. संदीप लोणी यांनी आभार मानले.

 जत येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमृतानंद महास्वामीजी, डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने