शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सांगली : तीन टप्प्यात वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांना देणी, जिल्हा बँकेतील बैठकीत तोडगा : ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:04 IST

वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थकीत रक्कम मिळण्यासाठी लढणाऱ्या निवृत्त कामगारांना शुक्रवारी दिलासा मिळाला.

ठळक मुद्देवसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांना तीन टप्प्यात देणीसांगली जिल्हा बँकेतील बैठकीत तोडगा ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय...तर त्यांनी अन्य प्रस्तावांचा विचार करावा

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थकीत रक्कम मिळण्यासाठी लढणाऱ्या निवृत्त कामगारांना शुक्रवारी दिलासा मिळाला.जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारु, शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे उपस्थित होते.

मागील काही महिन्यांपासून वसंतदादाच्या सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यात यावीत, या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक वर्षामध्ये आठशे कामगार निवृत्त झाले आहेत. काही कामगारांचा मृत्यू झाला. परंतु कारखाना अडचणीत आल्याने थकीत देणी मिळाली नाहीत.

सेवानिवृत्त कामगारांचे २७ कोटी रुपये कारखान्यांकडे अडकले आहेत. कारखाना दत्त इंडिया कंपनीने चालवायला घेतल्याने त्यांच्याकडून देणी देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली.संपूर्ण थकीत देणी देण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.

निवृत्त कामगारांच्या २७ कोटी रुपयांच्या देण्यांपैकी पंधरा टक्के कपात करुन ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांची देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला संघटनेने मान्यता दिली. कपात करण्यात आलेल्या रकमेचा प्रस्तावही कामगार मान्य करतील, असे स्पष्ट करण्यात आले.

भविष्य निर्वाह निधीचे २४ कोटी रुपये आहेत. ही रक्कम एप्रिलमध्ये एकरकमी देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ज्या कामगारांच्या थकीत रकमेत तफावत आहे, त्यांची दुरुस्ती करुन संबंधितांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त कामगार सदाशिव पाटील, रमेश पाटील, अशोक शिंदे, रघुनाथ माने, भाऊसाहेब कदम, चंद्रकांत सोनवले, धोंडीराम देवकाते, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते....तर त्यांनी अन्य प्रस्तावांचा विचार करावासेवानिवृत्त कामगारांच्या देण्यांबाबतचा प्रस्ताव दत्त इंडिया कंपनीने दिला आहे, तो सेवानिवृत्त कामगार आणि शेतकरी संघटनेलाही मान्य आहे. परंतु, काही कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी, हा प्रस्ताव ज्यांना मान्य नाही, त्यांनी अन्य प्रस्ताव स्वीकारावेत, शेतकरी संघटनेची त्याला काहीही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखानाSangliसांगली