शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगली : तीन टप्प्यात वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांना देणी, जिल्हा बँकेतील बैठकीत तोडगा : ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:04 IST

वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थकीत रक्कम मिळण्यासाठी लढणाऱ्या निवृत्त कामगारांना शुक्रवारी दिलासा मिळाला.

ठळक मुद्देवसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांना तीन टप्प्यात देणीसांगली जिल्हा बँकेतील बैठकीत तोडगा ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय...तर त्यांनी अन्य प्रस्तावांचा विचार करावा

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थकीत रक्कम मिळण्यासाठी लढणाऱ्या निवृत्त कामगारांना शुक्रवारी दिलासा मिळाला.जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारु, शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे उपस्थित होते.

मागील काही महिन्यांपासून वसंतदादाच्या सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यात यावीत, या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक वर्षामध्ये आठशे कामगार निवृत्त झाले आहेत. काही कामगारांचा मृत्यू झाला. परंतु कारखाना अडचणीत आल्याने थकीत देणी मिळाली नाहीत.

सेवानिवृत्त कामगारांचे २७ कोटी रुपये कारखान्यांकडे अडकले आहेत. कारखाना दत्त इंडिया कंपनीने चालवायला घेतल्याने त्यांच्याकडून देणी देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली.संपूर्ण थकीत देणी देण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.

निवृत्त कामगारांच्या २७ कोटी रुपयांच्या देण्यांपैकी पंधरा टक्के कपात करुन ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांची देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला संघटनेने मान्यता दिली. कपात करण्यात आलेल्या रकमेचा प्रस्तावही कामगार मान्य करतील, असे स्पष्ट करण्यात आले.

भविष्य निर्वाह निधीचे २४ कोटी रुपये आहेत. ही रक्कम एप्रिलमध्ये एकरकमी देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ज्या कामगारांच्या थकीत रकमेत तफावत आहे, त्यांची दुरुस्ती करुन संबंधितांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त कामगार सदाशिव पाटील, रमेश पाटील, अशोक शिंदे, रघुनाथ माने, भाऊसाहेब कदम, चंद्रकांत सोनवले, धोंडीराम देवकाते, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते....तर त्यांनी अन्य प्रस्तावांचा विचार करावासेवानिवृत्त कामगारांच्या देण्यांबाबतचा प्रस्ताव दत्त इंडिया कंपनीने दिला आहे, तो सेवानिवृत्त कामगार आणि शेतकरी संघटनेलाही मान्य आहे. परंतु, काही कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी, हा प्रस्ताव ज्यांना मान्य नाही, त्यांनी अन्य प्रस्ताव स्वीकारावेत, शेतकरी संघटनेची त्याला काहीही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखानाSangliसांगली