शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:14 IST

किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देवज्रचौंडेत विवाहितेची तीन मुलीसह विहिरीत आत्महत्यापतीशी वाद : दोन मुलींचे मृतदेह सापडले; दोघींचा शोध सुरु

सांगली : किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

सुनीता सुभाष राठोड (वय ३२), तिच्या मुली आशा (४ वर्षे), उषा (४ वर्षे) व ऐश्वर्या (२ वर्षे, सर्व मूळ रा. लमाणतांडा-विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी आशा व उषा या जुळ्या बहिणी आहेत. राठोड कुटूंब तीन महिन्यापूर्वी वज्रचौंडे येथे रस्त्याच्या कामाचे दगड फोडण्यासाठी आले आहे.

सुनीताच्या दोन बहिणी व भाऊही याच कामासाठी आले आहेत. ते गावातच माळावर झोपडी बांधून राहत होते. रविवारी कामावर सुट्टी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुनीताचे पती सुभाष लालसिंग राठोड (४०) याच्या खिशातील पैशाचे पाकीट गायब होते.

याबाबत त्याने सुनीताकडे विचारणा केली. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुभाष दुपारी बारा वाजता मेहूण्याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे गेला. त्याच्या पाठोपाठ सुनीताही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. घरापासून काही अंतरावर असलेल्या संभाजी वसंत जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.

सुभाष राठोड हा दुपारी चार वाजता घरी आला. सुनीता व मुली घरी नव्हत्या. त्याने परिसरात शोध घेतला. पण त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. सायंकाळी विहिरीचे मालक संभाजी जाधव विहिरीवरील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत चप्पलाचे दोन जोड तरंगताना आढळून आले. त्यांनी राठोड यांच्या वस्तीवर जाऊन विहिरीत चप्पल फेकू नका, असे सांगितले. त्यावेळी सुभाष राठोड यास संशय आला. त्याने विहिरीत जाऊन पाहिल्यानंतर या चप्पला मुलींच्या असल्याचे ओळखले.

सुनीताने मुलीसह आत्महत्या केल्याचा त्याला संशय आला. तासगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत अंधार झाल्याने या चौघींचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी शोध मोहिम सुरु करण्यास पोलीस व स्थानिक ग्रामस्थ गेले. आशा व उषा या जुळ्या बहिणींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोरखंडाच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. सुनीता व ऐश्वर्याचा शोध सुरु आहे.विहिर ५० फूटसंभाजी जाधव यांची विहीर ५० फूट खोत आहे. यामध्ये सध्या केवळ दहा फूट पाणी आहे. विहिरीला पाच ते सात फुटापर्यंत बांधीव काठ आहे. पायऱ्या नसल्याने विहिरीत उतरता येत नाही. त्यामुळे या चौघींचे मृतदेह काढताना खूप अडचणी आल्या.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस