शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:14 IST

किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देवज्रचौंडेत विवाहितेची तीन मुलीसह विहिरीत आत्महत्यापतीशी वाद : दोन मुलींचे मृतदेह सापडले; दोघींचा शोध सुरु

सांगली : किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

सुनीता सुभाष राठोड (वय ३२), तिच्या मुली आशा (४ वर्षे), उषा (४ वर्षे) व ऐश्वर्या (२ वर्षे, सर्व मूळ रा. लमाणतांडा-विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी आशा व उषा या जुळ्या बहिणी आहेत. राठोड कुटूंब तीन महिन्यापूर्वी वज्रचौंडे येथे रस्त्याच्या कामाचे दगड फोडण्यासाठी आले आहे.

सुनीताच्या दोन बहिणी व भाऊही याच कामासाठी आले आहेत. ते गावातच माळावर झोपडी बांधून राहत होते. रविवारी कामावर सुट्टी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुनीताचे पती सुभाष लालसिंग राठोड (४०) याच्या खिशातील पैशाचे पाकीट गायब होते.

याबाबत त्याने सुनीताकडे विचारणा केली. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुभाष दुपारी बारा वाजता मेहूण्याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे गेला. त्याच्या पाठोपाठ सुनीताही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. घरापासून काही अंतरावर असलेल्या संभाजी वसंत जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.

सुभाष राठोड हा दुपारी चार वाजता घरी आला. सुनीता व मुली घरी नव्हत्या. त्याने परिसरात शोध घेतला. पण त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. सायंकाळी विहिरीचे मालक संभाजी जाधव विहिरीवरील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत चप्पलाचे दोन जोड तरंगताना आढळून आले. त्यांनी राठोड यांच्या वस्तीवर जाऊन विहिरीत चप्पल फेकू नका, असे सांगितले. त्यावेळी सुभाष राठोड यास संशय आला. त्याने विहिरीत जाऊन पाहिल्यानंतर या चप्पला मुलींच्या असल्याचे ओळखले.

सुनीताने मुलीसह आत्महत्या केल्याचा त्याला संशय आला. तासगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत अंधार झाल्याने या चौघींचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी शोध मोहिम सुरु करण्यास पोलीस व स्थानिक ग्रामस्थ गेले. आशा व उषा या जुळ्या बहिणींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोरखंडाच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. सुनीता व ऐश्वर्याचा शोध सुरु आहे.विहिर ५० फूटसंभाजी जाधव यांची विहीर ५० फूट खोत आहे. यामध्ये सध्या केवळ दहा फूट पाणी आहे. विहिरीला पाच ते सात फुटापर्यंत बांधीव काठ आहे. पायऱ्या नसल्याने विहिरीत उतरता येत नाही. त्यामुळे या चौघींचे मृतदेह काढताना खूप अडचणी आल्या.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस