शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

सांगली : विद्यार्थ्यांनी छेडल्या तंतुवाद्यांच्या संशोधन तारा, मिरजेतील सफर : शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाचा भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:07 IST

पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.

ठळक मुद्देमिरज शहरात १८५० साली पहिले तंतुवाद्य तयारभारतीय तंतुवाद्य केंद्र, सरस्वती तंतुवाद्य केंद्र या ठिकाणांना भेट विद्यार्थ्यांनी पाहिली तंबोरा, सतार, सारंगी, दिलरूबा,रूद्रवीणा, ताऊस वाद्ये अभ्यास सहलीतून विद्यार्थ्यांसमोर उलगडला तंतुवाद्यनिर्मितीचा दीडशे वर्षांचा इतिहास

मिरज : पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या  माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंतुवाद्यनिर्मितीसाठी जगप्रसिध्द असणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती केंद्रांना भेट देऊन वाद्यनिर्मितीचा इतिहास आणि सध्यस्थिती जाणून घेतली. इतिहास विभागाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मिरज शहर हे तंतुवाद्यनिर्मितीसाठी प्रसिध्द आहे. तंतुवाद्यनिर्मितीचा इतिहास आणि निर्मितीप्रक्रीया विद्यार्थ्यांना समजावी, या हेतूने साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अभ्याससहल येथे आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी या अभ्यास सहलीचे आयोजन केले.मिरज शहरात १८५० साली ज्या ठिकाणी पहिले तंतुवाद्य तयार झाले, त्या भारतीय तंतुवाद्य केंद्र आणि सरस्वती तंतुवाद्य केंद्र या ठिकाणांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी वाद्यनिर्मितीचा इतिहास जाणून घेतला. तंबोरा, सतार, सारंगी, दिलरूबा,रूद्रवीणा, ताऊस अशी वाद्ये विद्यार्थ्यांनी यावेळी पाहिली.

या वाद्यांमधील फरक समजावून घेतला. मजीद सतारमेकर,अलताफ सतारमेकर, आतीक सतारमेकर यांनी ही वाद्ये कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षीक करून दाखवले. कोणतीही यांत्रीक साधने न वापरता केवळ हस्तकौशल्याच्या जोरावर ही वाद्ये तयार होत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.फरीदसाहेब सतारमेकर यांनी १८५० साली प्रतिकूल परिस्थितीमधून कशा पध्दतीने वाद्य तयार केले?, वाद्यासाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे भोपळे कुठून मागवले जातात?, यांसह अन्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

तंतुवाद्य कारागीरांच्या सध्याच्या समस्या काय आहेत, त्यांना शासनाकडून काही सहाय्य होते का? याचीही माहिती यावेळी घेण्यात आली. या अभ्यास सहलीतून तंतुवाद्यनिर्मितीचा दीडशे वर्षांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. 

टॅग्स :Sangliसांगलीcultureसांस्कृतिक