शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सांगलीचे कारागृह कैद्यांनी खचाखच

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

क्षमता ओलांडली : ३६२ कैदी; कारागृह स्थलांतराचा प्रस्ताव धूळ खात

सचिन लाड -- सांगली सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी क्षमता ओलांडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सव्वादोनशे क्षमता असलेल्या या कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. सध्या कारागृहात ३६२ कैदी आहेत. यामध्ये महिला कैदीही आहेत. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतर करण्यासाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्तावही धूळ खात पडला आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात स्वतंत्रपूर (ता. आटपाडी) येथे खुले कारागृह आहे. याठिकाणी शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची परवानगी दिली जाते. सांगली जिल्हा कारागृहात कच्चे कैदी ठेवले जातात. दोन-तीन महिने शिक्षा झालेल्या कैद्यांनाही येथे ठेवले जाते. पण त्यापेक्षा जादा शिक्षा झालेल्या कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविले जाते. २३५ क्षमता असलेले सांगलीचे कारागृह आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढत होतच राहिल्याने कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या मोठी आहे. कैद्यांची संख्या वाढत असली तरी, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ अपुरा आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोमवारअखेर कैद्यांची संख्या ३६२ होती. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे. पण साडेतीनशेचा आकडा गेल्या काही महिन्यात कधीच खाली आलेला नाही. कारागृहाच्या परिसरात टोलेजंग इमारती तयार झाल्या आहेत. त्यामुळे कारागृहात धोका असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पटवर्धन हायस्कूलचे छत तसेच परिसरातील इमारतींमधून कारागृहातील सर्व परिसर, बऱ्याक तसेच कैदी स्पष्टपणे दिसतात. कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी या कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांनाही सुरक्षिततेच्याबाबतीत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे स्थलांतराला गती आली होती. सुरक्षेचा प्रश्न : बांधकामाला अखेर बंदी!कारागृहाला सुरक्षिततेच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह परिसरात दोनशे मीटर अंतरावर नवीन बांधकाम करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी कारागृहाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी सांगलीत बैठकही झाली आहे. पण जुनी बांधकामेही कारागृहाच्या परिसरात धोक्याची बनली आहेत. यासाठी कवलापूर येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर कारागृह स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. शासनाने मंजुरी दिल्यास कारागृह व अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही तेथे बांधली जाणार आहेत.