शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

सांगलीचे कारागृह कैद्यांनी खचाखच

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

क्षमता ओलांडली : ३६२ कैदी; कारागृह स्थलांतराचा प्रस्ताव धूळ खात

सचिन लाड -- सांगली सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी क्षमता ओलांडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सव्वादोनशे क्षमता असलेल्या या कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. सध्या कारागृहात ३६२ कैदी आहेत. यामध्ये महिला कैदीही आहेत. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतर करण्यासाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्तावही धूळ खात पडला आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात स्वतंत्रपूर (ता. आटपाडी) येथे खुले कारागृह आहे. याठिकाणी शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची परवानगी दिली जाते. सांगली जिल्हा कारागृहात कच्चे कैदी ठेवले जातात. दोन-तीन महिने शिक्षा झालेल्या कैद्यांनाही येथे ठेवले जाते. पण त्यापेक्षा जादा शिक्षा झालेल्या कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविले जाते. २३५ क्षमता असलेले सांगलीचे कारागृह आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढत होतच राहिल्याने कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या मोठी आहे. कैद्यांची संख्या वाढत असली तरी, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ अपुरा आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोमवारअखेर कैद्यांची संख्या ३६२ होती. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे. पण साडेतीनशेचा आकडा गेल्या काही महिन्यात कधीच खाली आलेला नाही. कारागृहाच्या परिसरात टोलेजंग इमारती तयार झाल्या आहेत. त्यामुळे कारागृहात धोका असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पटवर्धन हायस्कूलचे छत तसेच परिसरातील इमारतींमधून कारागृहातील सर्व परिसर, बऱ्याक तसेच कैदी स्पष्टपणे दिसतात. कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी या कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांनाही सुरक्षिततेच्याबाबतीत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे स्थलांतराला गती आली होती. सुरक्षेचा प्रश्न : बांधकामाला अखेर बंदी!कारागृहाला सुरक्षिततेच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह परिसरात दोनशे मीटर अंतरावर नवीन बांधकाम करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी कारागृहाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी सांगलीत बैठकही झाली आहे. पण जुनी बांधकामेही कारागृहाच्या परिसरात धोक्याची बनली आहेत. यासाठी कवलापूर येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर कारागृह स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. शासनाने मंजुरी दिल्यास कारागृह व अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही तेथे बांधली जाणार आहेत.