शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सांगली : प्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:22 IST

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

सांगली : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा वापरही केवळ राजकारणासाठी केला. मी बाबासाहेबांचा वारसदार असे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला.मधुकर कांबळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्याकडून वंचित घटकांची दिशाभूल सुरू आहे. हे समाज घटक त्यांना बळी पडणार नाहीत. त्यांच्यासोबत जाणाऱ्या समाज घटकांचा नेहमीच भ्रमनिरास झाला आहे. मखराम पवार, भांडे यांच्यासारखे अनेकजण त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने आले, पण नंतर दूर झाले, असा दाखलाही त्यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय, समतेचे प्रतिक होते. पण प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या नाव लावले. राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर केला. पण काम मात्र काहीच केलेले नाही. त्यांनी केवळ नावाने नाही तर कर्माने बाबासाहेबांचे वारसदार व्हावे.

वंचित आघाडीचा प्रयोग केवळ निवडणुकीपुरता घेऊ नये. सामाजिक न्याय आणि समता हा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. खºया अर्थाने बाबासाहेबांचे वारसदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मधुकर कांबळे आहेत. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही श्री. कांबळे यांनी लगाविला.अनुसुचित जाती,ओबीसी, भटक्या समाजातील ज्या लहान जाती आहेत त्यांच्यापर्यंत विकासाचा प्रवाह गेलेला नसल्याने या जातींमध्येही विषमता दिसून येते. अनुसुचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोचवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अण्णाभाऊंसारख्या जागतिक दर्जाच्या साहित्यिकाचे, समाजसुधारकाचे स्मारक व्हावे असा प्रयत्न केला मात्र कुणी ते गांभीर्याने घेतले नाही.

अण्णाभाऊंचे मुंबईच्या चिरागनगरमध्ये एका झोपडीवजा घर एका दाक्षिणात्य व्यक्तीकडे गहाण ठेवले होते. ते घर मी घर सोडवून घेतले आहे. त्या जागेवर आता त्यांचे स्मारक बांधणार आहोत. तसेच त्यांच्या वारसदारांना राहण्यासाठी फ्लॅट देण्याचे आश्वासनही कांबळे यांनी दिले. वाटेगाव (ता. वाळवा) येथील स्मारकाचे पुनरुज्जीवन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSangliसांगली