शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : प्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:22 IST

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

सांगली : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा वापरही केवळ राजकारणासाठी केला. मी बाबासाहेबांचा वारसदार असे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला.मधुकर कांबळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्याकडून वंचित घटकांची दिशाभूल सुरू आहे. हे समाज घटक त्यांना बळी पडणार नाहीत. त्यांच्यासोबत जाणाऱ्या समाज घटकांचा नेहमीच भ्रमनिरास झाला आहे. मखराम पवार, भांडे यांच्यासारखे अनेकजण त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने आले, पण नंतर दूर झाले, असा दाखलाही त्यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय, समतेचे प्रतिक होते. पण प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या नाव लावले. राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर केला. पण काम मात्र काहीच केलेले नाही. त्यांनी केवळ नावाने नाही तर कर्माने बाबासाहेबांचे वारसदार व्हावे.

वंचित आघाडीचा प्रयोग केवळ निवडणुकीपुरता घेऊ नये. सामाजिक न्याय आणि समता हा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. खºया अर्थाने बाबासाहेबांचे वारसदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मधुकर कांबळे आहेत. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही श्री. कांबळे यांनी लगाविला.अनुसुचित जाती,ओबीसी, भटक्या समाजातील ज्या लहान जाती आहेत त्यांच्यापर्यंत विकासाचा प्रवाह गेलेला नसल्याने या जातींमध्येही विषमता दिसून येते. अनुसुचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोचवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अण्णाभाऊंसारख्या जागतिक दर्जाच्या साहित्यिकाचे, समाजसुधारकाचे स्मारक व्हावे असा प्रयत्न केला मात्र कुणी ते गांभीर्याने घेतले नाही.

अण्णाभाऊंचे मुंबईच्या चिरागनगरमध्ये एका झोपडीवजा घर एका दाक्षिणात्य व्यक्तीकडे गहाण ठेवले होते. ते घर मी घर सोडवून घेतले आहे. त्या जागेवर आता त्यांचे स्मारक बांधणार आहोत. तसेच त्यांच्या वारसदारांना राहण्यासाठी फ्लॅट देण्याचे आश्वासनही कांबळे यांनी दिले. वाटेगाव (ता. वाळवा) येथील स्मारकाचे पुनरुज्जीवन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSangliसांगली