शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सांगली महापालिका ‘बजेट’चे तीनतेरा...

By admin | Published: January 07, 2015 11:13 PM

महासभेकडून २६ कोटींची वाढ : वर्ष संपत आले तरी अंदाजपत्रकाचे पुस्तक नाही

सांगली : महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिन्यांचा अवधी असताना, अजूनही २०१४-१५ च्या अंदाजपत्रकातील तरतुदींची माहिती ना प्रशासनाला आहे, ना नगरसेवकांना! कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या या अंदाजपत्रकाचे गेल्या नऊ महिन्यात तीनतेरा वाजले आहेत. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना, विकासाचे इमले उभारणाऱ्या प्रशासन, सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले असून शिलकीपेक्षा तुटीकडेच अंदाजपत्रकाची वाटचाल सुरू असल्याचेच दिसून येते. यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक पूर्णत: कोलमडले आहे. त्याला अनेक कारणे आहेत. शासनाने एलबीटी लागू केल्यापासून पालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळू लागली. एकवेळ कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बँकेतील ठेवी मोडण्याची वेळ आली होती. विकास कामांसाठी पैसाच नसताना, अडचणीच वाढत होत्या. एचसीएल बंद पडल्याने घरपट्टी, पाणीपट्टीची बिले नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाहीत. परिणामी या दोन विभागाकडील वसुलीची थकबाकी कोट्यवधीच्या घरात पोहोचली. अशी स्थिती असतानाही यावर उपाययोजना शोधण्यापेक्षा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवित २०१४-१५ चे अंदाजपत्रक सादर केले. सुरुवातीला आयुक्त अजिज कारचे यांनी ४७३ कोटी जमेचे व २६ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात शासनाच्या निधीवर विकासाचे इमले उभारण्यात आले होते. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ४४ कोटी ११ लाखाची वाढ केली. त्यामुळे पालिकेचे अंदाजपत्रक ५३२ कोटीच्या घरात पोहोचले. एकीकडे अंदाजपत्रकातील आकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना, विकास कामांबद्दल मात्र नागरिकांची ओरड कायम होती. लोकसभा निवडणुकीमुळे स्थायी समितीकडून अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे अंदाजपत्रक सादर करण्यास जून महिना उजाडला होता. महासभेसमोर अंदाजपत्रक सादर झाल्यावर पुन्हा त्यात नव्याने काही तरतुदी करण्यात आल्या. महासभेने तब्बल २६ कोटी ७२ लाख रुपयांची वाढ करीत अंतिम अंदाजपत्रक ५६८ कोटी ८७ लाख रुपयांपर्यंत नेले. पण अजूनही या अंदाजपत्रकाच्या प्रती प्रशासन, नगरसेवकांना प्राप्त झालेल्या नाहीत. पालिकेचे आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. पुढील आर्थिक वर्ष २०१५-१६ चे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. पण अजूनही यंदाचे अंदाजपत्रकाचे पुस्तक कोणाच्याच हाती पडलेले नाही. नगरसेवकांनी महासभेत अंदाजपत्रक अंतिम करण्याचे अधिकार महापौरांना दिले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही अंतिम अंदाजपत्रक मिळाले नसल्याने त्यांच्या विकासाच्या अपेक्षांवर पाणी फिरणार आहे. (प्रतिनिधी)एलबीटीचा सर्वात मोठा फटका...एलबीटीच्या उत्पन्नावर पालिकेचा आर्थिक गाडा अवलंबून आहे. गतवर्षी ४९ कोटीवर एलबीटीची गाडी थांबली होती. आता डिसेंबरअखेर ५० कोटींची वसुली झाली आहे. पुढील तीन महिन्यात आणखी २० ते ३० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. ही वस्तुस्थिती बाजूला ठेवून आयुक्तांनी ९० कोटींचे उद्दिष्ट अंदाजपत्रकात अपेक्षित धरले होते. त्यात स्थायीने ३६ कोटीची वाढ केली, तर महासभेने २३ कोटी ७२ लाखांची वाढ केली. त्यामुळे ९० कोटीचे उद्दिष्ट १५० कोटीच्या घरात गेले. त्यावर आधारित विकास कामांच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण आता उत्पन्नच कमी झाल्याने या कामांना मुहूर्त मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.