शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:57 IST

इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.

ठळक मुद्देइस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळविधानसभा मतदारसंघातील हालचालीभाजपची उसनवारीच्या तव्यावर पोळी

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मंत्री खोत यांनी राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणून आपली पोळी भाजून घेतली आहे. तर खा. शेट्टी यांनी अलीकडील काही दिवसांत राष्ट्रवादीशी सलगी केली आहे. यामुळे सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील उसाला दर देण्यासाठी शेट्टी व खोत यांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठविला होता. साखर सम्राटांचे नेतृत्व करणारे तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शेट्टी आणि खोत यांनी रान पेटविले होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही महाआघाडीच्या माध्यमातून भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.

भाजपला चांगले यशही मिळाले आणि सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यासमोर मंत्रीपद दिसू लागले. ते मिळविण्यासाठी प्रसंगी खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली. त्यासाठी फडणवीस यांच्याकडे वाऱ्याही वाढविल्या. अखेर त्यांना कृषी राज्यमंत्री पद मिळाले.मंत्रिपदामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे वाटत असतानाच खोत यांनी भाजपची पाठराखण करीत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच रेंगाळत ठेवले. तसेच पुलतांबा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही त्यांनी कसलीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष बळावला. तेव्हापासून शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावत गेली.इस्लामपूर मतदारसंघावर एकमुखी नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीतीलच दोन प्यादी फोडून खोत यांनी स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष (पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे) निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात पाचवेळा मुख्यमंत्र्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या चळवळीबरोबर राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याचेच काम केले आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर गटांतील कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत इस्लामपूर मतदारसंघात राजकीय समीकरणे रोजच बदलत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीElectionनिवडणूक