शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सांगली : एम.सी.ई.डी. मार्फत इस्लामपूर येथे १५  मार्चपासून उद्योजकता विकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:30 IST

एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएम.सी.ई.डी. मार्फत इस्लामपूर येथे १५ मार्चपासून उद्योजकता विकास प्रशिक्षण१५ मार्च २०१८ पासून प्रशिक्षण सुरू

सांगली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट शासनाची उद्योजक घडवणारी प्रशिक्षण संस्था आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरूण युवक-युवती यांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देवून शासकीय योजनाव्दारे स्वयंरोजगार व उद्योगाबद्दल प्रोत्साहन देत असते.

या अनुषंगाने एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०१८ असून दिनांक १५ मार्च २०१८ पासून प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी ए. एम. खडककर यांनी दिली.खडककर म्हणाले, या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वत:चा उद्योग व स्वयंरोजगार करण्यास इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरूण, तरूणींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधीची निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, तसेच उद्योग व्यवसायास सहाय्यक करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती, मालाचे मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन, उद्योग आधार नोंदणी इत्यादी अधिकारी वर्गाव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच फळ प्रक्रिया, शेतीमाल प्रक्रिया, दूध उत्पादन व प्रक्रिया, शेळीपालन, कुक्कुट पालन, रेशीम उत्पादन व इतरही अनेक उद्योग व्यवसाय संधीबाबत तज्ज्ञ व्यक्तीव्दारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारास उद्योग व्यवसाय उभारण्याची तीव्र इच्छा असावी. उमेदवार किमान दहावी पास व १८ ते ४० वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवारांनी आधारकार्डची सत्यप्रत, शैक्षणिक मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला याच्या सत्यप्रती घेवून प्रवेश अर्ज सादर करावा.

प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अस्मिता आर. कोंडुसकर, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली, अक्षर कॉलोनी रोड नं. 9, कामेरी रोड इस्लामपूर येथे संपर्क साधावा.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय