शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

...तर संजय पाटील जिंकले असते?, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास अनेक घटक कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:09 IST

'हे' नेते गेले विराेधात

सांगली : विजयाबद्दलचा अतिआत्मविश्वास, नरेंद्र मोदींच्या जादूवर विसंबून राहण्यातील धन्यता तसेच अंतर्गत गटबाजीकडे केलेले दुर्लक्ष अशा अनेक घटकांमुळे भाजपने सांगली लोकसभेचा गड गमावला. नव्या चिन्हासह अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटील यांनी मिळविलेला विजय भाजपला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. नको त्या गोष्टीत ताकद लावण्यापेक्षा आवश्यक तिथे ऊर्जा खर्ची केली असती, तर संजय पाटील निवडून आले असते, असा तर्क लढविला जात आहे.सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर करून पक्ष कार्यालय थाटणाऱ्या भाजपला प्रचारासाठी सर्वाधिक वेळ मिळाला होता. पण, उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातून उफाळलेली नाराजी दुर्लक्षित करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धन्यता मानली. दुसरीकडे उमेदवार असलेले संजय पाटील यांच्या समर्थकांनीही गटबाजीला सबुरीने हाताळण्याऐवजी ‘जशास तसे’ भूमिका स्वीकारली. त्यामुळे वाद शांत होण्याऐवजी चिघळत गेला. वाद मिटविण्यासाठी उमेदवारासह एकाही वरिष्ठ नेत्याने राजकीय कौशल्य वापरले नाही.जतचे माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांची नाराजी त्यांना शेवटपर्यंत दूर करता आली नाही. मिरजेतील काही नगरसेवकांनीही संजय पाटील यांच्याविरोधात उघडपणे काम सुरू केले. त्यांना शांत करण्याची जबाबदारी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली, मात्र ते त्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. मतदान जवळ आल्यानंतर केलेली धडपड कामी आली नाही. सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामागे मोदी मॅजिकवरील अवलंबित्व हेच कारण होते.

नको त्या गोष्टीत ताकदप्रतिस्पर्धी उमेदवारासमोर अनेक अपक्ष उमेदवार उभे करणे, चांगले चिन्ह मिळू नये यासाठी बुद्धीचा वापर करणे, विजयासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या व्यक्तिगत जीवनातील माहिती गोळा करणे अशा गोष्टीतच उमेदवाराच्या समर्थकांनी अधिक ताकद खर्ची घातली.

मतांच्या विभागणीवरच अधिक लक्ष२०१९च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा झाला होता. तोच फॉर्म्युला यंदाच्या निवडणुकीत वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र, ही खेळी काँग्रेस नेत्यांनी प्रचारापूर्वीच उजेडात आणल्याने भाजपचे हे छुपे अस्त्र निकामी झाले.

..तर निकाल वेगळा असताकाँग्रेसमध्ये आमदार विश्वजीत कदम यांनी गटबाजीला मूठमाती देऊन सर्व नेत्यांची मोळी जशी बांधली तशी भाजपला बांधता आली असती तर कदाचित यंदाच्या लोकसभेत भाजपच्या पदरात यश पडले असते. पण, त्यांना या निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला.

हे नेते गेले विराेधातजतमधून माजी आमदार विलासराव जगताप, कडेगावमधून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या स्वकीय नेत्यांसह कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, खानापूर मतदारसंघातून बाबर कुटुंबीय यांच्याशी संजय पाटील यांचे सूर कधीच जुळले नाहीत. नेमकी हीच गोष्ट विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडली. वेळीच नात्यांची डागडुजी झाली असती तर त्याचा फायदा संजय पाटील यांना झाला असता.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालsanjaykaka patilसंजयकाका पाटीलBJPभाजपा