शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगली : जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफी, लाभार्थी ८७ हजारावर, तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:28 IST

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापुढे ग्रीन यादी प्रसिद्ध होणार नसून तालुकास्तरीय कमिटीकडून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थी ८७ हजारावर तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण

सांगली : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापुढे ग्रीन यादी प्रसिद्ध होणार नसून तालुकास्तरीय कमिटीकडून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अद्याप ७५ हजार शेतकरी प्रतिक्षेत आहेत. कर्जमाफीसाठी तालुका सहकार उपनिबंधक (ए. आर.) यांच्या अध्यक्षतेखाली् समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पुढील आठवड्यात एक दिवशीय प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १.८३ लाख शेतकरी कुटुंबानी अर्ज आॅनलाईन भरले होते. जिल्ह्यातील कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाच्या चार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यापुढे यादी प्रसिद्ध होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतू पात्र-अपात्रतेबाबतची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे.

ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, तसेच ज्यांनी अर्ज भरलेला नाही, मात्र कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांनाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज केला, पण त्यांची नावे आलेली नाहीत, त्यांच्या अजार्ची पडताळणी तालुकास्तरीय समितीकडून केली जाईल. त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.एक लाख शेतकरी चारही याद्यांमध्ये कर्जमाफीस पात्र होऊ शकलेले नाहीत. त्यांना कर्जमाफी देण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली आहे. कर्जमाफीसाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी तालुका सहकारी उपनिबंधक आहेत. याबाबत आदेश तीन दिवसापूर्वी काढण्यात आला. यापुढे सरकारकडून कर्जमाफीची यादी जाहीर केली जाणार नाही.राज्य शासनाने आजअखेर केलेल्या कर्जमाफीच्या चार याद्यांतून ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. ती माफी देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभाग, जिल्हा बँका, सहकार विभागाला नाकी नऊ आले होते.

गेली चार महिने माफीचा खेळ सुरू होता. आता उर्वरित ७५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठा विषय तालुकास्तरीय समितीच्या कोर्टात टाकला आहे.त्या समितीकडून खऱ्या अथार्ने शेतकऱ्यांना केव्हा, किती व कसा न्याय मिळेल हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.सर्वाधिक काम तालुकास्तरीय कमिटीला...ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले मात्र ज्यांना माफी मिळालेली नाही. त्या आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तालुका समितीने अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. राज्य सरकार, जिल्हा सहकार उपनिबंधक, जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीपेक्षा जादा काम तालुकास्तरीय समितीला करावे लागणार आहे हे निश्चित आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार