शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगलीत कृष्णा पुन्हा पात्राकडे, पाणी पातळीत घट : नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:07 IST

rain, sangli कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.

ठळक मुद्देसांगलीत कृष्णा पुन्हा पात्राकडे पाणी पातळीत घट : नागरिकांना दिलासा

सांगली: कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी गुरुवारी रात्री ३७ फुटावर गेली होती.

शहरातील सुर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट, इनामदार प्लॉट, वॉटर पार्वष्ठ, पटवर्धन कॉलनी, साईनाथनगर आदी परिसरातील ६४० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले. तर पुराच्या पाण्यामुळे कृष्णा काठावरील महादेव मंदिर, कृष्णामाई मंदिर पाण्याखाली गेले. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.शुक्रवारी मात्र सांगलीकरांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटेपासून पाणीपातळीत घट होऊ लागली. दुपारी दोन वाजेपर्यंत चार फुट पाणी उतरले होते. कृष्णा नदी पुन्हा पात्राकडे गेली होती. कर्नाळ रस्त्यावरील पाणीही ओसरले होते. सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील कुटूंबेही घराकडे परतली आहेत.कॉलनीत पाण्याचा वेढामुसळधार पावसामुळे शहरातील नाले तुंबल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते. शामरावनगर, टिंबर एरिया, स'ाद्रीनगर, शिंदे मळा, गर्व्हेमेंट कॉलनी परिसरातील कॉलन्यात अजूनही पाणी साचून होते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. आता या पाण्याला दुर्गंधी येत लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली