शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

सांगलीत कृष्णा पुन्हा पात्राकडे, पाणी पातळीत घट : नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:07 IST

rain, sangli कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.

ठळक मुद्देसांगलीत कृष्णा पुन्हा पात्राकडे पाणी पातळीत घट : नागरिकांना दिलासा

सांगली: कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी गुरुवारी रात्री ३७ फुटावर गेली होती.

शहरातील सुर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट, इनामदार प्लॉट, वॉटर पार्वष्ठ, पटवर्धन कॉलनी, साईनाथनगर आदी परिसरातील ६४० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले. तर पुराच्या पाण्यामुळे कृष्णा काठावरील महादेव मंदिर, कृष्णामाई मंदिर पाण्याखाली गेले. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.शुक्रवारी मात्र सांगलीकरांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटेपासून पाणीपातळीत घट होऊ लागली. दुपारी दोन वाजेपर्यंत चार फुट पाणी उतरले होते. कृष्णा नदी पुन्हा पात्राकडे गेली होती. कर्नाळ रस्त्यावरील पाणीही ओसरले होते. सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील कुटूंबेही घराकडे परतली आहेत.कॉलनीत पाण्याचा वेढामुसळधार पावसामुळे शहरातील नाले तुंबल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते. शामरावनगर, टिंबर एरिया, स'ाद्रीनगर, शिंदे मळा, गर्व्हेमेंट कॉलनी परिसरातील कॉलन्यात अजूनही पाणी साचून होते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. आता या पाण्याला दुर्गंधी येत लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली