शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

सांगली : जयंत पाटलांनी नेतृत्व विसरून जावे : चंद्रकांत पाटील, बालेकिल्ल्याचा विषय संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:03 IST

पश्चिम महाराष्ट्र हा आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राहिलेला नाही. यापुढे सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात केवळ भाजपचेच अस्तित्व राहणार असल्यने जयंत पाटील यांनी या भागाचे नेतृत्व करण्याचे विसरावे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केली.

ठळक मुद्देजयंत पाटलांनी नेतृत्व विसरून जावे : चंद्रकांत पाटीलकॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा विषय संपला

सांगली : पश्चिम महाराष्ट्र हा आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राहिलेला नाही. यापुढे सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात केवळ भाजपचेच अस्तित्व राहणार असल्यने जयंत पाटील यांनी या भागाचे नेतृत्व करण्याचे विसरावे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केली.भाजप नेते नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस आणि महापालिकेतील भाजपचा विजयोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी इनामदार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, महापौर संगीता खोत, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, दिलीप सूर्यवंशी, दीपक शिंदे, सुरेश आवटी, गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते.ते म्हणाले की, सांगली, कोल्हापूरचे विषय संपले आहेत. पुढील आठवड्यात साताऱ्यातही लक्ष घालणार आहोत. यापुढे तीनही जिल्ह्यांत फक्त भाजपच असेल. जयंत पाटील आता आजी नव्हे माजी नेते म्हणून ओळखले जातील.

महापालिकेच्या २0१३ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. ती सल शेखर इनामदार यांच्या मनात होती. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. भाजपच्या विजयाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे महापालिकेत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकला.

सांगली महापालिका जिंकल्यामुळे आता आम्हाला केरळ व तामिळनाडूची निवडणूकही सोपी वाटू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे संयोजक म्हणूनही इनामदार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

खासदार संजय पाटील यांना ते देशात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणतील. तसेच सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील  सर्व खासदार आणि आमदार आमचेच असतील, याचीही खात्री वाटते.

सदाभाऊ खोत म्हणाले, भाजपला ज्या काळात विजयाची गरज होती, त्याचवेळी योग्य नियोजन करून इनामदार यांनी विजयासाठी प्रयत्न केले. यापुढेही त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. खासदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन इनामदार यांनी केले. आम्ही त्यांच्यासोबत होता. त्यामुळे विजयाचे ते शिल्पकार आहेत.आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा संकल्प इनामदार यांच्या मागील वाढदिवसाला आम्ही केला व तो पूर्ण केला. महापौर केबिनमध्ये त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला. आता पुढे विकासाची जबाबदारी ते चोख पार पाडतील.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण