शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

सांगली : कडेगाव-पलूसमध्ये मैत्रीचे वारे : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर संघर्षाला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:25 IST

कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत चर्चेला उधाण , मैत्रीपूर्ण राजकारणाचा पाया घालण्याचा प्रारंभगेल्या २५ वर्षांपासून मतदारसंघात कडवे राजकारण सुरू होते. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता.

अतुल जाधव ।देवराष्ट : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला. परंतु डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर देशमुख-कदम यांचा कडवा राजकीय सघर्ष संपुष्टात आला की काय? असा प्रश्न दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. डॉ. कदम यांच्या निधनानंतर अनेक बाबतीत विश्वजित व संग्राम यांनी मैत्रीपूर्ण राजकारण केले आहे. त्यामुळे कडेगाव-पलूसच्या राजकीय मैदानात आता मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत मिळत आहेत.

१९९५ मध्ये आमदार संपतराव देशमुख यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याविरुध्द कदम यांच्या विरोधकांची मोट बांधत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीत डॉ. कदम यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करीत देशमुख यांनी कदम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मात्र आमदार देशमुख यांचे अवघ्या दोन वर्षातच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी डॉ. पतंगराव कदम यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली.

तेव्हापासून मतदार संघात कदम-देशमुख यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष डॉ. कदम यांच्या निधनापर्यंत प्रकर्षाने जाणवत होता. डॉ. कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये संग्रामसिंंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन संघर्ष कमी करण्याच्यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमासाठी आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम यांनी अचानक हजेरी लावत देशमुखांसह सर्वांनाच धक्का दिला होता.

यानंतर मतदारसंघातील काही कार्यक्रमात संग्रामसिंंह देशमुख व विश्वजित कदम यांनी गळाभेट घेत संघर्षमय राजकारणाला यु टर्न देत मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत दिले आहेत. कदम-देशमुख यांचे गेल्या २५ वर्षांपासून मतदारसंघात कडवे राजकारण सुरू होते. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. एवढा कडवा राजकीय संघर्ष नेते व गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही होता. यांच्या राजकीय संघर्षात अनेक कार्यकर्त्यांवर न्यायालयीन खटले अनेक वर्षे चालू होते. या सर्वाला बगल देत कदम-देशमुख यांनी कडेगाव-पलूस मतदार संघात मैत्रीपूर्ण राजकारणाचा पाया घालण्याचा प्रारंभ केलेला दिसत आहे.कदम-देशमुख यांची जवळीक : तिसऱ्या पर्यायाचा जोरकडेगाव-पलूस मतदार संघात कदम-देशमुख यांच्या वाढत्या जवळीकतेने मतदारसंघात तिसरा पर्याय जोर धरू लागला आहे. यांना तिसरा पर्याय म्हणून आजपर्यंत जी. डी. (बापू) लाड यांच्या गटाकडे पाहिले जात होते. मात्र वाढती कदम-देशमुख यांची जवळीक पाहता, दोन्ही बाजूकडील अनेक सक्षम कार्यकर्ते नाराज होऊ लागले आहेत.

यामुळे भाजपचे कट्टर समर्थक अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी तिसऱ्या पर्यायाची मोट बांधणी चालू केली आहे.या मतदारसंघात लाड कुटुंबीय तिसरा पर्याय म्हणून राजकारणात नेहमीच सक्रिय आहेत. पण या कुटुंबाला आजपर्यंत राजकीय संधी मिळालेली नाही. त्यामुळे लाड व कदम-देशमुख यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते एकत्र येऊन कदम-देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण करणार? असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली