शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : कडेगाव-पलूसमध्ये मैत्रीचे वारे : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर संघर्षाला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:25 IST

कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत चर्चेला उधाण , मैत्रीपूर्ण राजकारणाचा पाया घालण्याचा प्रारंभगेल्या २५ वर्षांपासून मतदारसंघात कडवे राजकारण सुरू होते. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता.

अतुल जाधव ।देवराष्ट : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला. परंतु डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर देशमुख-कदम यांचा कडवा राजकीय सघर्ष संपुष्टात आला की काय? असा प्रश्न दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. डॉ. कदम यांच्या निधनानंतर अनेक बाबतीत विश्वजित व संग्राम यांनी मैत्रीपूर्ण राजकारण केले आहे. त्यामुळे कडेगाव-पलूसच्या राजकीय मैदानात आता मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत मिळत आहेत.

१९९५ मध्ये आमदार संपतराव देशमुख यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याविरुध्द कदम यांच्या विरोधकांची मोट बांधत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीत डॉ. कदम यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करीत देशमुख यांनी कदम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मात्र आमदार देशमुख यांचे अवघ्या दोन वर्षातच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी डॉ. पतंगराव कदम यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली.

तेव्हापासून मतदार संघात कदम-देशमुख यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष डॉ. कदम यांच्या निधनापर्यंत प्रकर्षाने जाणवत होता. डॉ. कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये संग्रामसिंंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन संघर्ष कमी करण्याच्यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमासाठी आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम यांनी अचानक हजेरी लावत देशमुखांसह सर्वांनाच धक्का दिला होता.

यानंतर मतदारसंघातील काही कार्यक्रमात संग्रामसिंंह देशमुख व विश्वजित कदम यांनी गळाभेट घेत संघर्षमय राजकारणाला यु टर्न देत मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत दिले आहेत. कदम-देशमुख यांचे गेल्या २५ वर्षांपासून मतदारसंघात कडवे राजकारण सुरू होते. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. एवढा कडवा राजकीय संघर्ष नेते व गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही होता. यांच्या राजकीय संघर्षात अनेक कार्यकर्त्यांवर न्यायालयीन खटले अनेक वर्षे चालू होते. या सर्वाला बगल देत कदम-देशमुख यांनी कडेगाव-पलूस मतदार संघात मैत्रीपूर्ण राजकारणाचा पाया घालण्याचा प्रारंभ केलेला दिसत आहे.कदम-देशमुख यांची जवळीक : तिसऱ्या पर्यायाचा जोरकडेगाव-पलूस मतदार संघात कदम-देशमुख यांच्या वाढत्या जवळीकतेने मतदारसंघात तिसरा पर्याय जोर धरू लागला आहे. यांना तिसरा पर्याय म्हणून आजपर्यंत जी. डी. (बापू) लाड यांच्या गटाकडे पाहिले जात होते. मात्र वाढती कदम-देशमुख यांची जवळीक पाहता, दोन्ही बाजूकडील अनेक सक्षम कार्यकर्ते नाराज होऊ लागले आहेत.

यामुळे भाजपचे कट्टर समर्थक अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी तिसऱ्या पर्यायाची मोट बांधणी चालू केली आहे.या मतदारसंघात लाड कुटुंबीय तिसरा पर्याय म्हणून राजकारणात नेहमीच सक्रिय आहेत. पण या कुटुंबाला आजपर्यंत राजकीय संधी मिळालेली नाही. त्यामुळे लाड व कदम-देशमुख यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते एकत्र येऊन कदम-देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण करणार? असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली