शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पुराच्या विळख्यातून मुक्त; स्थलांतरित नागरिकांना दिलासा, महापालिकेकडून स्वच्छता सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:53 IST

सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन ...

सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन गेलेल्या नागरी वस्त्या व नदीकाठावर स्वच्छता, औषध फवारणी सुरू केली आहे.पुरामुळे सांगलीतील २ हजार नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. पूरग्रस्त भागात अद्याप अस्वच्छता व दुर्गंधी असल्याने बहुतांश स्थलांतरित नागरिक परतले नाहीत. निवारा केंद्रात त्यांनी मुक्काम केला आहे. सांगली शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीच्या चारही घाटांची स्वच्छता पूर्ण केली. बारा दिवस पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि नदीच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा संकलित झाला होता. ७० टन कचरा महापालिकेने गोळा केला.महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ.रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर आणि २०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली.

हे भाग झाले पुरातून मुक्तसूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, जामवाडी, काकानगर, दत्तनगर येथील सर्व नागरी वस्त्या पुराच्या पाण्यातून मुक्त झाल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छता व औषध फवारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

पहाटे ओसरला पूरसांगलीत बुधवारी पहाटे सहा वाजता पुराची पातळी २९ फूट ११ इंच झाल्यानंतर नदीच्या घाटासह सर्व नागरी वस्त्या मुक्त झाल्या. दिवसभरात पाणी पूर्णपणे नदीपात्रात गेले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत नदीपातळी २३ फुटांपर्यंत खाली गेली. मिरजेतील पाणीपातळी ४० फुटांवर आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर