शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सांगली : ‘वंचित बहुजन’चा गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:34 PM

सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन ...

ठळक मुद्देप्रत्येक गावात छावणीची मागणी : सिंचन योजनांची वीज बिले टंचाई निधीतून भरा

सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन योजना अखंडित चालू ठेवून त्यांचे सर्व वीज बिल टंचाई निधीतून भरावे, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी तसेच जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. कार्यकर्ते गाढवे घेऊन मोर्चात सहभागी झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गाढव, घोडा, शेळ्या-मेंढ्या यांच्यासाठी त्वरित चारा छावण्या चालू कराव्यात, इतर जनावरांप्रमाणे त्यांना अनुदान द्यावे, चारा छावण्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात गाव तिथे चारा छावणी सुरू करावी, छावण्या सुरू करण्याबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, टेंभू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ या उपसा सिंचन योजनांची आवर्तने निश्चित करून पाणी द्यावे, या योजनांमधील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप थांबवावा, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, टँकरची सुविधा देण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तलाव, विहिरींत म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनांचे पाणी सोडावे, आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता.विश्रामबाग चौकातील विलिंग्डन महाविद्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली.

यावेळी ‘आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत फलक हाती घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. डॉ. सुदर्शन घेरडे, डॉ. विवेक गुरव, अमोल वेटम, निवांत कोळेकर, नानासाहेब वाघमारे, आश्रफ वानकर, महेश कांबळे, टिपू इनामदार, करिम मुजावर, मुनीर मुल्ला, बाळासाहेब रास्ते, संजय कांबळे, शिवाजी पवार, विनायक रुपनर, आनंदराव म्हारगुडे, पिंटू माने, राहुल मदने आदी उपस्थित होते.दुष्काळ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच : गोपीचंद पडळकरजनावरांसाठी चारा छावण्या आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळत नाहीत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मोर्चावेळी केली. माणसांचे मोर्चे काढून सरकार ऐकत नाही, त्यामुळे गाढवांचा मोर्चा काढण्यात आला आहे. जत, आटपाडी तालुक्यात वीस दिवसांनी टँकर मिळतात. प्रशासनाचे नियोजन नसून, ते हतबल झाले आहे. दुष्काळी योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप