शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

सांगली जिल्ह्यात १७.२५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 13:18 IST

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

ठळक मुद्देउत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत.

सांगली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ लाख ५६ हजार ९६४ टन उसाचे गाळप कमी झाले असून, १७ लाख २५ हजार १०९ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्यांच्या साखर विक्रीवर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात १८ साखर कारखाने असून त्यापैकी माणगंगा, केन अ‍ॅग्रो, महांकाली, डफळे, यशवंत, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद राहिले. उर्वरित १२ साखर कारखान्यांनी हंगाम पूर्ण केले. हंगाम सुरू करण्यापासून ते संपेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला.

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

एकमेव उदगिरी शुगरने गतवर्षीपेक्षा २० हजार टन साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ११.९० टक्केवरुन १२.३५ टक्केपर्यंत वाढविल्यामुळेच उदगिरीचे उत्पादन जादा झाले आहे. उर्वरित कारखान्यांचे गतवर्षीपेक्षा गाळप आणि साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. उत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत. शेवटच्या महिन्यात गाळपास गेलेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने