शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

सांगली जिल्ह्यात साडेसहा टक्क्याने वीज गळतीमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:29 IST

तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे.

ठळक मुद्दे१.६ टक्के गळती वाढली : महावितरणकडून उपाययोजना

सांगली : तीन वर्षात जिल्ह्यातील वीज गळती साडेसहा टक्क्याने कमी झाली आहे. सांगली शहर विभागाची वीज गळती मात्र १.६ टक्क्याने वाढली आहे. उर्वरित चारही विभागातील वीज गळती कमी झाल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. प्रत्यक्षात वीज गळती कमी होत असतानाही ग्राहकांवरील इंधन अधिभार मात्र वाढतच आहे.

महावितरणकडून दरवर्षी वीज गळती आणि चोरीचा आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. जिल्ह्यात विद्युत बिलाची वसुली राज्यात सर्वाधिक असतानाही निधी मात्र तुटपुंजा मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीपंपाची विद्युत कनेक्शन्स प्रलंबित आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्लामपूर विभागाची २०१५-१६ या वर्षात १६.८६ टक्के गळती होती. यामध्ये दोन वर्षात २.४ टक्क्याने घट होऊन २०१७-१८ मध्ये १४.४६ टक्के झाली आहे. कवठेमहांकाळ विभागाची २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ३७.१८ टक्के वीज गळती होती.यामध्ये २०१७-१८ वर्षात १३.०१ टक्क्याने कपात होऊन २०१७-१८ वर्षात २४.१७ टक्के झाली आहे. सांगली ग्रामीण आणि विटा विभागाचीही वीज गळती कमी झाली आहे.

सांगली शहरची २०१५-१६ वर्षात ५.१४ टक्के वीज गळती होती. ती ४.१२ टक्केपर्यंत आली. मात्र २०१७-१८ या वर्षात मात्र १.६४ टक्क्याने वीज गळती वाढली असून, सध्या ती ५.७६ टक्क्यावर गेली आहे. वीज गळतीच्या प्रश्नाकडे महावितरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील तीन वर्षामधील वीज गळतीचे प्रमाणविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८इस्लामपूर १६.८६ टक्के १४.९५ टक्के १४.४६ टक्केकवठेमहांकाळ ३७.१८ २५.४४ २४.१७सांगली ग्रामीण २२.६८ १९.८७ १८.२८सांगली शहर ५.१४ ४.१२ ५.७६विटा २५.६५ १९.५४ १५.३४सांगली जिल्हा २२.२० १७.३८ १५.८०

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल