महाआवास अभियानात सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST2021-08-27T04:28:51+5:302021-08-27T04:28:51+5:30
सांगली : महाआवास अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेने पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळविला आहे. पुण्याने पहिला क्रमांक पटकावला असून, सातारा ...

महाआवास अभियानात सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
सांगली : महाआवास अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेने पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळविला आहे. पुण्याने पहिला क्रमांक पटकावला असून, सातारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य पुरस्कृत योजनेतून ही निवड झाली.
तालुका स्तरावर कागल (जि. कोल्हापूर), खेड (जि. पुणे) व पाटण (जि. सातारा) तालुके पहिल्या तीन स्थानांवर राहिले. ग्रामपंचायत स्तरावर अंबावडे (ता. भोर), वाशेरे (ता. खेड) आणि कोंढवळ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायती यशस्वी ठरल्या. प्रधानमंत्री आवास योजनेत कोल्हापूरने पहिला क्रमांक मिळविला असून, पुणे व सातारा जिल्हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तालुका स्तरावर गगनबावडा (जि. कोल्हापूर), पाटण (जि. सातारा) आणि राधानगरी (जि. कोल्हापूर) या तीन तालुक्यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. ग्रामपंचायत स्तरावर नींब (ता. पाटण), टाकवे बुद्रूक (ता. मावळ) आणि भूड (ता. खानापूर) ग्रामपंचायतींनी पहिले तीन क्रमांक मिळविले. शासकीय जागा व वाळू उपलब्धता स्पर्धेत भोरे, पाटण व शिरुर तालुक्यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले.
विभागस्तरीय अंमलबजावणी, मूल्यमापन व संनियंत्रण समितीची बैठक सोमवारी झाली, त्यामध्ये यशस्वी जिल्हे व तालुके निश्चित करण्यात आले. पुरस्कार सोहळा पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. ३०) होणार आहे.