शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सांगली जिल्ह्यात नाही शंभर टक्के साक्षरतेचे एकही गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:01 IST

सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे.

ठळक मुद्देपावणेपाच लाख निरक्षर : महिला साक्षरतेत पलूस तालुका अव्वल; मिरज तालुक्यात सर्वाधिक निरक्षर

अविनाश कोळी।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त, शंभर टक्के वीजपुरवठायुक्त, शंभर टक्के तंटामुक्त, शंभर टक्के चांगले रस्ते व सुविधांनी युक्त गावे निर्माण करण्यासाठी मोहिमा घेण्यात आल्या. मात्र शंभर टक्के साक्षर गावासाठी मोहीम आजवर राबविली नाही.

जिल्ह्यात सद्यस्थितीत निरक्षर लोकांची संख्या ७ लाख ७२ हजार ६७६ इतकी मोठी आहे. निरक्षरतेत मिरज तालुका सर्वात आघाडीवर आहे. याठिकाणी एकूण २ लाख ९ हजार ४२५ निरक्षर लोक आहेत. त्याखालोखाल जतमध्ये १ लाख २७ हजार ४८६ इतके निरक्षर लोक आहेत. गावांच्या संख्येची वर्गवारी केली, तर आजही जिल्ह्यात १९ गावे ५१ ते ६0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. समाधानाची बाब म्हणजे, सर्वाधिक गावांची संख्या ८१ ते ९0 टक्के साक्षरतेच्या घरात आहे. एकूण ३0५ गावे या वर्गात आहेत. त्याखालोखाल २५५ गावे ७१ ते ८0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. ६१ ते ७0 टक्के साक्षर असलेल्या गावांची संख्या १३५ इतकी आहे. तरीही एकही गाव शंभर टक्के साक्षर नाही.

जिल्ह्यात साक्षर लोकसंख्या २0 लाख ८६ हजार ६२५ इतकी असून याची टक्केवारी ८१.४८ इतकी आहे. महिला व पुरुषांची तुलना केली, तर जिल्ह्यात आजही महिला मागे आहेत. पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये १३.६३ टक्के इतकी तफावत आहे. पुरुष साक्षरतेची जिल्ह्याची टक्केवारी ८८.२२ इतकी चांगली असताना, महिला साक्षरतेचे प्रमाण ७४.५९ इतके कमी आहे.ग्रामीण भाग पिछाडीवरमहिला व पुरुष साक्षरतेप्रमाणेच शहरी व ग्रामीण साक्षरतेची अवस्था आहे. आजही ग्रामीण भाग साक्षरतेत शहरांच्या तुलनेत खूप मागे आहे. शहरी भागाचे साक्षरता प्रमाण ८६.२४ टक्के असून ग्रामीणचे प्रमाण ७९.८४ इतके आहे. ग्रामीण साक्षरतेच्या बाबतीत पलूस तालुका ८६.११ टक्क्यांनी सर्वात आघाडीवर आहे, तर जत तालुका ७0.३७ टक्क्यांनी सर्वात पिछाडीवर आहे.तालुकानिहाय साक्षरता (टक्केवारी)तालुका एकूण पुरुष महिलाशिराळा ७८.८८ ८९.३६ ६८.८0वाळवा ८४.८७ ९१.२९ ७८.१३पलूस ८६.११ ९0.९६ ८0.९६कडेगाव ८0.९८ ८८.९८ ७३.0५खानापूर ८0.२४ ८९.0७ ७१.८२आटपाडी ७२.७४ ८२.३४ ६३.२४तासगाव ८२.४५ ८९.१९ ७५.५७मिरज ८२.१९ ८९.२६. ७४.७७क.महांकाळ ७८.५७ ८६.५७ ७0.३९जत ७0.३७ ७८.२९ ६२.१0एकूण ८१.४८ ८८.२२ ७४.५९शहरी भागातील साक्षरता (टक्केवारी)शहर एकूण पुरुष महिलाइस्लामपूर ८७.८८ ९२.६२ ८२.९९आष्टा ८३.६0 ८९.५२ ७७.३२विटा ८७.२७ ९२.0८ ८२.२९तासगाव ८८.0२ ९२.९८ ८२.८७सां.मि.कु. ८५.९१ ९0.0२ ८१.७७