शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात नाही शंभर टक्के साक्षरतेचे एकही गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:01 IST

सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे.

ठळक मुद्देपावणेपाच लाख निरक्षर : महिला साक्षरतेत पलूस तालुका अव्वल; मिरज तालुक्यात सर्वाधिक निरक्षर

अविनाश कोळी।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त, शंभर टक्के वीजपुरवठायुक्त, शंभर टक्के तंटामुक्त, शंभर टक्के चांगले रस्ते व सुविधांनी युक्त गावे निर्माण करण्यासाठी मोहिमा घेण्यात आल्या. मात्र शंभर टक्के साक्षर गावासाठी मोहीम आजवर राबविली नाही.

जिल्ह्यात सद्यस्थितीत निरक्षर लोकांची संख्या ७ लाख ७२ हजार ६७६ इतकी मोठी आहे. निरक्षरतेत मिरज तालुका सर्वात आघाडीवर आहे. याठिकाणी एकूण २ लाख ९ हजार ४२५ निरक्षर लोक आहेत. त्याखालोखाल जतमध्ये १ लाख २७ हजार ४८६ इतके निरक्षर लोक आहेत. गावांच्या संख्येची वर्गवारी केली, तर आजही जिल्ह्यात १९ गावे ५१ ते ६0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. समाधानाची बाब म्हणजे, सर्वाधिक गावांची संख्या ८१ ते ९0 टक्के साक्षरतेच्या घरात आहे. एकूण ३0५ गावे या वर्गात आहेत. त्याखालोखाल २५५ गावे ७१ ते ८0 टक्के साक्षरतेच्या घरात आहेत. ६१ ते ७0 टक्के साक्षर असलेल्या गावांची संख्या १३५ इतकी आहे. तरीही एकही गाव शंभर टक्के साक्षर नाही.

जिल्ह्यात साक्षर लोकसंख्या २0 लाख ८६ हजार ६२५ इतकी असून याची टक्केवारी ८१.४८ इतकी आहे. महिला व पुरुषांची तुलना केली, तर जिल्ह्यात आजही महिला मागे आहेत. पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये १३.६३ टक्के इतकी तफावत आहे. पुरुष साक्षरतेची जिल्ह्याची टक्केवारी ८८.२२ इतकी चांगली असताना, महिला साक्षरतेचे प्रमाण ७४.५९ इतके कमी आहे.ग्रामीण भाग पिछाडीवरमहिला व पुरुष साक्षरतेप्रमाणेच शहरी व ग्रामीण साक्षरतेची अवस्था आहे. आजही ग्रामीण भाग साक्षरतेत शहरांच्या तुलनेत खूप मागे आहे. शहरी भागाचे साक्षरता प्रमाण ८६.२४ टक्के असून ग्रामीणचे प्रमाण ७९.८४ इतके आहे. ग्रामीण साक्षरतेच्या बाबतीत पलूस तालुका ८६.११ टक्क्यांनी सर्वात आघाडीवर आहे, तर जत तालुका ७0.३७ टक्क्यांनी सर्वात पिछाडीवर आहे.तालुकानिहाय साक्षरता (टक्केवारी)तालुका एकूण पुरुष महिलाशिराळा ७८.८८ ८९.३६ ६८.८0वाळवा ८४.८७ ९१.२९ ७८.१३पलूस ८६.११ ९0.९६ ८0.९६कडेगाव ८0.९८ ८८.९८ ७३.0५खानापूर ८0.२४ ८९.0७ ७१.८२आटपाडी ७२.७४ ८२.३४ ६३.२४तासगाव ८२.४५ ८९.१९ ७५.५७मिरज ८२.१९ ८९.२६. ७४.७७क.महांकाळ ७८.५७ ८६.५७ ७0.३९जत ७0.३७ ७८.२९ ६२.१0एकूण ८१.४८ ८८.२२ ७४.५९शहरी भागातील साक्षरता (टक्केवारी)शहर एकूण पुरुष महिलाइस्लामपूर ८७.८८ ९२.६२ ८२.९९आष्टा ८३.६0 ८९.५२ ७७.३२विटा ८७.२७ ९२.0८ ८२.२९तासगाव ८८.0२ ९२.९८ ८२.८७सां.मि.कु. ८५.९१ ९0.0२ ८१.७७