शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सांगली जिल्हा बँकेची थकबाकी ५७५ कोटींवर, वसुलीचे मोठे आव्हान; तीन वर्षात किती झाली घट.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:26 IST

बड्या कर्जदारांविरोधात एनसीएलटीनुसार कारवाई

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२१पर्यंत नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) ७५० कोटी थकबाकी होती. बँकेचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून तीन वर्षात १७५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अजूनही ५७५ कोटी थकबाकी वसुलीचे जिल्हा बँकेसमोर मोठे आव्हान आहे. बड्या थकबाकीदारांवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) नुसार कारवाई करण्यासाठी बँकेच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.जिल्हा बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत ८ हजार १०० कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच ७ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. ठेवीमध्ये ७०० कोटींची, तर कर्ज वाटपात ५५० कोटींची वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या नफ्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण, जिल्हा बँकेकडील जुनी थकीत कर्ज डोकेदुखी ठरत आहेत.साखर कारखाने, सुतगिरण्यांसह अन्य काही संस्था आणि शेती कर्जदारांचा समावेश आहे. सर्वाधिक थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे. वसंतदादा, केन ॲग्रो, महांकाली आणि माणगंगा साखर कारखान्यांकडेच ५५० कोटींची थकबाकी आहे. ही सर्व एनपीएची थकबाकी आहे. या कारखान्यांवर एनसीएलटीमध्ये जिल्हा बँकेतर्फे दावा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी व्याज सवलतीसाठी मुदतीत कर्ज भरा : नाईकराज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, शासन कर्जमाफी देणार नाही. यामुळे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे २५ कोटींची थकबाकी त्वरित जिल्हा बँकेकडे भरून शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांना केले. दि. ३१ मार्च २०२५नंतर थकीत कर्जदाराला १२ टक्के व्याजासह दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. व्याज, दंडातून सुटका होण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दत्त इंडियाने ८ वर्षात ४८ कोटीच भरलेदत्त इंडिया कंपनीला वसंतदादा साखर कारखाना ८४ कोटी ३७ लाख रुपये थकीत कर्ज जिल्हा बँकेत भरून भाड्याने चालवण्यासाठी दिला आहे. पण, दत्त इंडिया कंपनीने गेल्या आठ वर्षात केवळ ४८ कोटी रुपये भरले आहेत. दत्त इंडिया कंपनीकडे तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असून, ३६ कोटी ३७ लाख रुपये वसुलीचे मोठे आव्हान जिल्हा बँकेसमोर आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक