शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

सांगली जिल्हा बँकेची थकबाकी ५७५ कोटींवर, वसुलीचे मोठे आव्हान; तीन वर्षात किती झाली घट.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:26 IST

बड्या कर्जदारांविरोधात एनसीएलटीनुसार कारवाई

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२१पर्यंत नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) ७५० कोटी थकबाकी होती. बँकेचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून तीन वर्षात १७५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अजूनही ५७५ कोटी थकबाकी वसुलीचे जिल्हा बँकेसमोर मोठे आव्हान आहे. बड्या थकबाकीदारांवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) नुसार कारवाई करण्यासाठी बँकेच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.जिल्हा बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत ८ हजार १०० कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच ७ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. ठेवीमध्ये ७०० कोटींची, तर कर्ज वाटपात ५५० कोटींची वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या नफ्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण, जिल्हा बँकेकडील जुनी थकीत कर्ज डोकेदुखी ठरत आहेत.साखर कारखाने, सुतगिरण्यांसह अन्य काही संस्था आणि शेती कर्जदारांचा समावेश आहे. सर्वाधिक थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे. वसंतदादा, केन ॲग्रो, महांकाली आणि माणगंगा साखर कारखान्यांकडेच ५५० कोटींची थकबाकी आहे. ही सर्व एनपीएची थकबाकी आहे. या कारखान्यांवर एनसीएलटीमध्ये जिल्हा बँकेतर्फे दावा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी व्याज सवलतीसाठी मुदतीत कर्ज भरा : नाईकराज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, शासन कर्जमाफी देणार नाही. यामुळे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे २५ कोटींची थकबाकी त्वरित जिल्हा बँकेकडे भरून शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांना केले. दि. ३१ मार्च २०२५नंतर थकीत कर्जदाराला १२ टक्के व्याजासह दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. व्याज, दंडातून सुटका होण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दत्त इंडियाने ८ वर्षात ४८ कोटीच भरलेदत्त इंडिया कंपनीला वसंतदादा साखर कारखाना ८४ कोटी ३७ लाख रुपये थकीत कर्ज जिल्हा बँकेत भरून भाड्याने चालवण्यासाठी दिला आहे. पण, दत्त इंडिया कंपनीने गेल्या आठ वर्षात केवळ ४८ कोटी रुपये भरले आहेत. दत्त इंडिया कंपनीकडे तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असून, ३६ कोटी ३७ लाख रुपये वसुलीचे मोठे आव्हान जिल्हा बँकेसमोर आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक