शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेची पुन्हा ओटीएस योजना; शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:02 IST

ही योजना राबविणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक

सांगली : नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे. बँकेकडून थकबाकीदार शेतकरी व संस्थांसाठी ओटीएस योजना राबविली जाणार आहे. ही योजना राबविणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. तसेच चालू आर्थिक वर्षात २२५ कोटी नफ्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेने मागील काही वर्षांत गतीने आर्थिक प्रगती केली आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असून, बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा ओटीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी झाली. अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच शेती मालाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करून शकले नाहीत. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकेने स्वत:च्या नफ्यातून ओटीएस योजना राबविली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या थकित कर्जावरील व्याजाची सवलत दिल्याने बँकेची कर्जवसुली झाली.चालूवर्षी पुन्हा योजना सुरू करणार आहे. थकबाकीदार शेतकरी व संस्थांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. मागील योजनेत सुधारणा करून नवी योजना आणली जाईल. बँकेच्या नफ्यातून थकबाकीदार शेतकरी, संस्थांना ओटीएस देणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. बँकेच्या या योजनेची माहिती आता अन्य काही जिल्हा बँकांनी घेतली असून, तेथेही ही योजना लागू होणार आहे.

एनपीए शून्य टक्के करणारजिल्हा बँकेने मार्च २०२५ चे उद्दिष्ट ठेवून कर्जवसुली व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्च २५ अखेर बँकेने २२५ कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ठेवींमध्ये एक हजार कोटींची वाढ करून नऊ हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला जाईल. कर्जपुरवठाही ८०० कोटींनी वाढवून सात हजार ५०० कोटींवर नेण्याचा प्रयत्न आहे. बँकेचा व्यवसाय १५ हजार कोटी रुपयांवर नेण्यात येईल. मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के करण्याचा प्रयत्न आहे, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचे निकष पूर्णजिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व आर्थिक सक्षमता आणि गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. येत्या काळात जिल्हा बँक राज्यातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये असेल. बँकेने मोबाइल, नेट बँकिंगसह अन्य तांत्रिक सेवा सुरू करण्यासाठी आरबीआयला नाबार्डच्या मान्यतेने पुन्हा प्रस्ताव सादर करणार आहे. बँकेच्या नवीन दहा शाखांना मान्यतेचा प्रस्तावही रिझर्व्ह बँकेला सादर करणार आहे, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक