शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 18:59 IST

पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्रदेश कार्यकारिणीलाही चिंता

अविनाश कोळीसांगली : पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्तील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगली काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव, गोंधळ व गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व आता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नेत्यांनी मान्य केले होते. समन्वयाची तात्पुरती जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर सोपविण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या जिल्'ात भाजपने याच परिस्थितीचा फायदा घेत मुसंडी मारली आहे.

खासदार तसेच सर्वाधिक चार आमदार असलेला भाजप आता ताकद विस्तारण्यात दंग आहे. दुसरीकडे भाजपला टक्कर देण्याची तयारी करण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले. त्यामुळे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जेवढी ताकद काँग्रेसकडे होती, त्यातील निम्मी ताकदही आता राहिलेली नाही. सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीला आलेले उधाण काँग्रेसची ताकद कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

कार्यकर्त्यांच्या बाबतीत काँग्रेस अन्य पक्षांच्या तुलनेत मजबूत दिसत असला तरी, नेत्यांमधील गटबाजीमुळे त्यांचे सैन्य खचले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना चिंता वाटत आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशानंतर काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनातही उत्साहाच्या लाटा दिसून आल्या. पण दुसरीकडे धुमसणारी गटबाजीही तितक्याच तीव्रतेने या लाटांवर स्वार होताना दिसून आली.

मदन पाटील, पतंगराव कदम यांच्या काळातही गटबाजी होती, मात्र सर्व गटांना ऐन निवडणुकीत पंखाखाली घेत ताकदीने लढत देण्याचे त्यांच्यात कसबही होते. आता तसा प्रयत्न करणारा किंवा तशी ताकद असलेला एकही नेता काँगे्रसकडे नाही. भाजपला टक्कर देताना काँग्रेसला आता स्वत:चे घर प्रथम दुरुस्त करावे लागणार आहे.गटबाजी उजेडात, मार्ग सापडेनाआॅगस्टमध्ये काँग्रेसच्या सांगलीतील संघर्ष यात्रेत प्रदेशच्या दिग्गज नेत्यांसमोर गटबाजी दिसून आली. शहरात लावलेल्या फलकांवरही पक्षाचे नेते, पदाधिकारी गटबाजीमुळे विभागले गेले होते. यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोट ठेवले होते. त्यापूर्वीही विधानपरिषद निवडणूक, महापालिका निवडणूक यामध्येही गटबाजी दिसून आली. वरिष्ठ नेत्यांना या गोष्टी कळूनही, त्यांना मार्ग सापडत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीcongressकाँग्रेस