शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

सांगली : तासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 13:34 IST

तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देतासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : तटकरे शासनपुरस्कृत गुंडगिरीचे राज्यभर दर्शन

सांगली : तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले की, शासनपुरस्कृत गुंडगिरीचे दर्शन आता राज्यभर घडू लागले आहे. तासगावमधील प्रकार कसा घडला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही, त्यांचा या प्रकाराला आशिर्वाद होता का, असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जत येथील सभेतही आम्हाला खासदार, आमदारांच्या गुंडगिरीबद्दल जनतेमधून रोष दिसून आला. जनता या सर्व गोष्टी बघत आहे. त्यामुळे योग्यवेळी भाजपला त्यांची जागा जनताच दाखवून देईल. सरकारचा हस्तक्षेप सर्वच क्षेत्रात सुरू झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचेही नियम त्यांनी हवे तसे बदलले. कर्नाटकमधील निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर कळाला होता. त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या माध्यमातूनही ते निवडणुका जिंकू पहात आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांमागे चौकशा लावल्या जातात, ही गोष्ट आता नवी राहिली नाही. आमच्या पक्षाच्या मागे सिंचन घोटाळ््याची चौकशी लावली आहे. बऱ्याच गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेनेलाही ते अशाच पद्धतीने धमकावत आहेत.नालायकांमध्ये शिवसेनेचे १२ मंत्रीअंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू केल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका केली. शिवसेनेने विरोधाची औपचारिकता दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांकडे डोळे वठारून पाहिल्यानंतर ते मंत्री मौन बाळगून खाली बसले.

शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण आता सर्वांनाच कळाले आहे. शिवसेना सरकारला नेहमीच नालायक म्हणते, पण याच नालायकांमध्ये यांचे १२ मंत्री आहेत, याचे भान त्यांना दिसत नाही.जातीय दंगलीची चिन्हे!विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. निवडणुका अशा जातीय दंगलींच्या बळावर लढविल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनीच याविषयी सतर्कता बाळगावी, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस