शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामचंद्र वेलणकरांना सांगली भूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:14 IST

उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे गरजू लोकांना विविध ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो रुपयांचे दानकारखान्याचे नेतृत्व मुलींना देऊन उद्योग क्षेत्रात नवा पायंडाकार्याला सन्मानित करण्याच्या उद्देशाने विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप

सांगली ,दि. ११ : उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी दिली. 

विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिस दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सांगलीतील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. यंदा हा पुरस्कार रामचंद्र वेलणकरांना जाहीर करण्यात आला. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वेलणकर यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सांगलीत उद्योगाचा पाया घालणाऱ्या वि. रा. वेलणकर यांचे रामचंद्र हे पुत्र आहेत. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ६३ वर्षे गजानन विव्हिंग मिल्सची जबाबदारी सांभाळली आहे. अनेक संकटातून हा उद्योग वाढवून त्यांनी या उद्योगात त्यांच्या मुलींनाही समावून घेतले. 

राज्यातील कापड आणि सूत उद्योग सध्या अत्यंत अडचणीत आहे. रामचंद्र आणि त्यांच्या मुलींनी अशा परिस्थितीत अत्यंत जिद्दीने आणि योग्य नियोजनाने मिल्स चालविण्याची अवघड गोष्ट लिलया साध्य करून दाखविली.

उद्योगाबरोबरच चारित्र्य आणि नितीमूल्य जोपासण्यासाठी आपल्या वडिलांपेक्षाही जास्त कष्ट रामचंद्र यांनी घेतले. त्यांची सामाजिक जाणीवही अत्यंत तीव्र आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा वेगळा ठसा दिसून येतो. प्रत्येक काम चिकाटीने आणि प्रामाणिकपणे करण्याचा मार्ग त्यांनी सोडला नाही.

गरिब आणि अनाथ मुलींसाठी कार्यरत असलेल्या वेलणकर अनाथ बालकाश्रम या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचे दान गरजू लोकांना दिले आहे.

कारखान्याचे नेतृत्वही त्यांनी मुलींना देऊन उद्योग क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. त्यांच्या या सर्व कार्याला सन्मानित करण्याच्या उद्देशाने सांगली भूषण पुरस्कार देण्यात येत असल्याचे दांडेकर यांनी म्हटले आहे. आजवरचे पुरस्कारप्राप्त मान्यवरविश्व जागृती मंडळाने आजवर नेत्र विशारद भैय्यासाहेब परांजपे, खासदार आण्णासाहेब गोटखिंडे, प्रख्यात गायिका आशाा भोसले, राजमतीआक्का पाटील, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, स्वातंत्र्यसैनिक धोंडीरामबापू माळी, उद्योगपती बाबुकाका शिरगावकर, कवी सुधांशू, गोवा स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे, नटवर्य मास्टर अविनाश, सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर, कृषीभूषण प्रं. शं. ठाकूर, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, अ‍ॅड. शशिकांत पागे, डॉ. एस. बी. कुलकर्णी, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. म. द. हातकणंगलेकर, नानासाहेब चितळे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना सन्मानित केले आहे.

टॅग्स :Sangliसांगली