शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 12:40 IST

सांगलीला सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र मंडल कार्यालयाची प्रतीक्षा आहे.

सांगली : सांगलीला सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र मंडल कार्यालयाची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी तसे प्रस्ताव शासनाला दिले आहेत. सध्या सांगलीचे कामकाज कोल्हापूर मंडलातून चालते.

सांगलीचा सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापनेपासूनच कोल्हापूर मंडलात आहे. साताऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्याकडेही स्वतंत्र विभाग व अधीक्षक अभियंता आहे. कोल्हापूर व सांगलीचा व्याप मोठा असतानाही एकच अधीक्षक अभियंता आहे. जिल्ह्यात मिरज व सांगली पश्चिम असे दोन विभाग आहेत. मिरजेच्या अंतर्गत सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव व जतचे दोन असे सात उपविभाग आहेत. सांगली विभागात शिराळा, इस्लामपूर, तासगाव, विटा, आटपाडी उपविभाग आहेत.कोरोनाकाळात सांगलीची वार्षिक उलाढाल सुमारे ३०० कोटी रुपये झाली. त्यापूर्वी ४०० कोटींपर्यंतची कामे व्हायची. गेल्या काही वर्षांत कामांचा व्याप प्रचंड वाढला आहे. सर्वच आमदार कामांसाठी सार्वजनिक बांधकामकडे जातात. महापालिकादेखील बरीच कामे करून घेते. या स्थितीत सार्वजनिक बांधकामला वरिष्ठ अभियंते व कर्मचाऱ्यांची चणचण भासते. स्वतंत्र मंडल कार्यालयामुळे जादा मनुष्यबळ मिळण्याची अपेक्षा आहे.

सध्या सांगलीच्या फायली कोल्हापूरमार्फत पुण्याला मुख्य अभियंत्यांकडे जातात. कोल्हापूरचा व्याप मोठा असल्याने साहजिकच तेथील कामांना प्राधान्य मिळते.

सांगलीची वार्षिक नियोजनातील कामे व निधीचे प्रस्ताव वेळेत मार्गी लागतात, पण नियोजनात नसणाऱ्या ऐनवेळच्या कामांसाठी मात्र कोल्हापुरात पाठपुरावा करावा लागतो. रस्त्यांचे पॅचवर्क, पट्टे मारणे, इमारतींच्या दुरुस्त्या, छोट्या मोऱ्यांचे बांधकाम, मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी ऐनवेळची कामे आदींसाठी ताकद लावावी लागते. कोरोनाकाळात रुग्णालये व कोविड सेंटर्सची अनेक कामे कोल्हापुरातून मंजुरी घेऊन करावी लागली.

ही उठाठेव थांबविण्यासाठी सांगलीला स्वतंत्र मंडल कार्यालय व अधीक्षक अभियंत्याची मागणी आहे. मंत्री पाटील व डॉ. कदम यांनी लक्ष घातल्याने लवकरच प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

कशासाठी हवे स्वतंत्र सांगली कार्यालय?

- कोल्हापूरवरील अवलंबित्व कमी होईल

- अभियंत्यांचे हेलपाटे कमी होऊन निर्णय वेळेत होतील

- सांगलीच्या कामांना त्वरित मंजुऱ्या मिळतील

- समान निधीवाटप होईल

‘लोकमत’च्या बातमीनंतर पट्टे मारले

गेल्यावर्षी सांगली-मिरज रस्त्यावर पट्टे मारण्याचे व रिफ्लेक्टर बसविण्याचे सुमारे ३५ लाखांचे काम कोल्हापुरात मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सुमारे चार महिने फाईल पडून होती. ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केल्यावर अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले व निर्णय झाला.

टॅग्स :Sangliसांगलीpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर