शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

सांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:09 IST

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

ठळक मुद्देकर्नाळ रोडपर्यंत पाणी : सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे स्थलांतर सुरूसांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

सांगली : कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

दरम्यान, महापालिकेने सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

खासदार संजयकाका पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सूर्यवंशी प्लॉटला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. धरणातून वाढता विसर्ग व संततधार पावसामुळे रविवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी १७ फुटापर्यंत खाली होती. पण शनिवारपासून कोयनेतून विसर्ग सुरू झाला. रविवारी सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २३ फूट होती.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात पाच फुटाने वाढ होऊन २८ फुटापर्यंत पोहोचली होती. कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून कर्नाळ रोडपर्यंत पाणी पसरले होते. पावसाचा जोर व धरणातील विसर्ग पाहता महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.

शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये ३० ते ३२ फुटाला पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या. सकाळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी प्लॉटमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या.

सायंकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट दिली. सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, भलचिम कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला.

शहरातील नागरिकांना पुन्हा पुराची धास्ती वाटत आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील अनेक कुटुंबांनी स्थलांतराची मानसिक तयारी केली आहे. या कुटुंबांनी घरातील साहित्याची आवराआवरही सुरू केली होती.

सांगलीच्या पूरपट्ट्यातून कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत. नागरिकांनी पाणी पातळी वाढण्याची वाट न पाहता वेळीच घराबाहेर पडावे. महापालिकेने स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था केली आहे. घराबाहेर न पडणाºया नागरिकांची घरे पोलिसांच्या मदतीने सक्तीने सील केली जातील.- नितीन कापडणीस, आयुक्त 

 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस