शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:09 IST

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

ठळक मुद्देकर्नाळ रोडपर्यंत पाणी : सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे स्थलांतर सुरूसांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

सांगली : कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

दरम्यान, महापालिकेने सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

खासदार संजयकाका पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सूर्यवंशी प्लॉटला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. धरणातून वाढता विसर्ग व संततधार पावसामुळे रविवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी १७ फुटापर्यंत खाली होती. पण शनिवारपासून कोयनेतून विसर्ग सुरू झाला. रविवारी सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २३ फूट होती.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात पाच फुटाने वाढ होऊन २८ फुटापर्यंत पोहोचली होती. कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून कर्नाळ रोडपर्यंत पाणी पसरले होते. पावसाचा जोर व धरणातील विसर्ग पाहता महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.

शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये ३० ते ३२ फुटाला पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या. सकाळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी प्लॉटमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या.

सायंकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट दिली. सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, भलचिम कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला.

शहरातील नागरिकांना पुन्हा पुराची धास्ती वाटत आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील अनेक कुटुंबांनी स्थलांतराची मानसिक तयारी केली आहे. या कुटुंबांनी घरातील साहित्याची आवराआवरही सुरू केली होती.

सांगलीच्या पूरपट्ट्यातून कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत. नागरिकांनी पाणी पातळी वाढण्याची वाट न पाहता वेळीच घराबाहेर पडावे. महापालिकेने स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था केली आहे. घराबाहेर न पडणाºया नागरिकांची घरे पोलिसांच्या मदतीने सक्तीने सील केली जातील.- नितीन कापडणीस, आयुक्त 

 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस