शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
4
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
5
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
6
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
7
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
8
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
9
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
10
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
11
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
12
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
13
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
14
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
17
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
18
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
19
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
20
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

सांगली : अक्षता फुलांच्या...रुखवत पुस्तकांचा, विटा शहरात अनोखा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 14:08 IST

एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.

ठळक मुद्देअक्षता फुलांच्या...रुखवत पुस्तकांचा, विटा शहरात अनोखा विवाह सोहळा विट्यात मराठा समाजाकडून नव्या परंपरेची बीजे

अविनाश कोळी

सांगली : एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील एक विवाह सोहळा निश्चित झाला. मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाहसोहळा विटा शहरात पार पडला.

विवाह सोहळ्याच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या ए. डी. पाटील यांनी वधु आणि वर पक्षाकडील सर्व कुटुंबियांचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा परिणाम म्हणजे समाजात क्रांतीचे बीज रोवणारा समारंभ म्हणून हा विवाह ओळखला गेला. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्यांच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरुपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला.वऱ्हाडी मंडळींनाही हा सोहळा भारावून टाकणारा होता. फुलांचा सुंदर सडा याठिकाणी अक्षतांच्या माध्यमातून पडला होता. सुगंध सभागृहात आणि प्रत्येकाच्या मनामनातही दरवळ राहिला. प्रत्येक लग्नात केवळ १0 टक्केच अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर, तर उर्वरीत अक्षता उपस्थित असलेल्या माणसांच्या डोईवर पडत असतात. मंगलाष्टका झाल्यानंतर तांदळांचा सडा पायदळी तुडविला जातो. हे सर्व अन्न वाया जाते. त्यामुळे ही चुकीची परंपरा हद्दपार करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय या कुटुंबियांनी घेऊन नवा पायंडा पाडला.अंधशाळा, सुश्रुषा केंद्राला मदतजेवणाशिवाय अतिरिक्त तांदुळ खरेदी करून तो या विवाहाच्या निमित्ताने मिरजेतील अंधशाळेला आणि संवेदना सुश्रुषा केंद्रास भेट म्हणून देण्यात आला. अंधशाळेचे प्रमुख विजय लेले, संतोष पाटील, ए. डी. पाटील यांच्यासह वधु-वरांचे पालकही यावेळी उपस्थित होते.मंगलाष्टकांसह विचारांचा जागरमंगलाष्टकांसह या विवाह सोहळ्यात विचारांचा जागरही करण्यात आला. अशा पद्धतीचा परंपरेला छेद देणारा विवाह सोहळा का करावा लागला, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार काय आहेत, मराठा समाजाने प्रगतीचा कोणता मार्ग निवडायला हवा अशा अनेक बाजुंनी विचारमंथनही झाले.वीस लाख तांदुळ दरवर्षी वाया...लग्नसमारंभात मार्गदर्शन करताना ए. डी. पाटील म्हणाले की, प्रत्येक लग्नात सरासरी ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ४ लाख लग्ने होत असतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी आपण महाराष्ट्रात सुमारे २0 लाख किलो तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो.

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोवाडा येथे लहान मुले अन्न नाही म्हणून कुपोषित होत आहेत. हा विरोधाभास थांबणार तरी कधी? तब्बल १३५ वर्षापूर्वीच महात्मा फुले यांनी लग्नामध्ये तांदळाऐवजी फुले टाकायचा विचार मांडला होता. तो आज यानिमित्ताने आपण स्वीकारत आहोत.

टॅग्स :marriageलग्नSangliसांगली