शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सांगली : अक्षता फुलांच्या...रुखवत पुस्तकांचा, विटा शहरात अनोखा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 14:08 IST

एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.

ठळक मुद्देअक्षता फुलांच्या...रुखवत पुस्तकांचा, विटा शहरात अनोखा विवाह सोहळा विट्यात मराठा समाजाकडून नव्या परंपरेची बीजे

अविनाश कोळी

सांगली : एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील एक विवाह सोहळा निश्चित झाला. मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाहसोहळा विटा शहरात पार पडला.

विवाह सोहळ्याच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या ए. डी. पाटील यांनी वधु आणि वर पक्षाकडील सर्व कुटुंबियांचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा परिणाम म्हणजे समाजात क्रांतीचे बीज रोवणारा समारंभ म्हणून हा विवाह ओळखला गेला. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्यांच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरुपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला.वऱ्हाडी मंडळींनाही हा सोहळा भारावून टाकणारा होता. फुलांचा सुंदर सडा याठिकाणी अक्षतांच्या माध्यमातून पडला होता. सुगंध सभागृहात आणि प्रत्येकाच्या मनामनातही दरवळ राहिला. प्रत्येक लग्नात केवळ १0 टक्केच अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर, तर उर्वरीत अक्षता उपस्थित असलेल्या माणसांच्या डोईवर पडत असतात. मंगलाष्टका झाल्यानंतर तांदळांचा सडा पायदळी तुडविला जातो. हे सर्व अन्न वाया जाते. त्यामुळे ही चुकीची परंपरा हद्दपार करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय या कुटुंबियांनी घेऊन नवा पायंडा पाडला.अंधशाळा, सुश्रुषा केंद्राला मदतजेवणाशिवाय अतिरिक्त तांदुळ खरेदी करून तो या विवाहाच्या निमित्ताने मिरजेतील अंधशाळेला आणि संवेदना सुश्रुषा केंद्रास भेट म्हणून देण्यात आला. अंधशाळेचे प्रमुख विजय लेले, संतोष पाटील, ए. डी. पाटील यांच्यासह वधु-वरांचे पालकही यावेळी उपस्थित होते.मंगलाष्टकांसह विचारांचा जागरमंगलाष्टकांसह या विवाह सोहळ्यात विचारांचा जागरही करण्यात आला. अशा पद्धतीचा परंपरेला छेद देणारा विवाह सोहळा का करावा लागला, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार काय आहेत, मराठा समाजाने प्रगतीचा कोणता मार्ग निवडायला हवा अशा अनेक बाजुंनी विचारमंथनही झाले.वीस लाख तांदुळ दरवर्षी वाया...लग्नसमारंभात मार्गदर्शन करताना ए. डी. पाटील म्हणाले की, प्रत्येक लग्नात सरासरी ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ४ लाख लग्ने होत असतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी आपण महाराष्ट्रात सुमारे २0 लाख किलो तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो.

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोवाडा येथे लहान मुले अन्न नाही म्हणून कुपोषित होत आहेत. हा विरोधाभास थांबणार तरी कधी? तब्बल १३५ वर्षापूर्वीच महात्मा फुले यांनी लग्नामध्ये तांदळाऐवजी फुले टाकायचा विचार मांडला होता. तो आज यानिमित्ताने आपण स्वीकारत आहोत.

टॅग्स :marriageलग्नSangliसांगली