शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

सांगलीत ‘शरीरसौष्ठव’ची केमिस्ट्री बिघडली

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

खेळाडूंची फरफट : संघटनांमधील सत्तासंघर्ष, वशिलेबाजी, वर्चस्ववादामुळे खेळाला फटका

आदित्यराज घोरपडे -हरिपूर -‘शरीरसौष्ठव’ म्हणजे सांगलीचा श्वास. समांतर संघटनांचे राजकारण, सत्तासंघर्ष, वशिलेबाजी आणि वर्चस्ववादामुळे खेळाडूंची फरफट होत आहे. खेळातील राजकारणास कंटाळून काही खेळाडूंनी खेळास ‘रामराम’ ठोकला, तर काहीजण इतर जिल्ह्यातून खेळण्याच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील शरीरसौष्ठवची केमिस्ट्री बिघडल्यानं ‘केमिकल लोचा’ झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅकफूटवर फेकला गेला आहे. टॉप टू बॉटम सुपर पोझेस देऊन आपल्या पिळदार शरीरयष्टीनं महाराष्ट्राला भूरळ घालणारे अनेक शरीरसौष्ठवपटू सांगलीच्या मातीनं घडवले. मात्र गेल्या वर्षभरात सांगलीच्या शरीरसौष्ठवची केमिस्ट्रीचं बिघडली. जिल्ह्यात दोन समांतर शरीरसौष्ठव संघटना काम करत आहेत. त्यामुळे खेळाडूंची विभागणी झाली. अर्थात राज्यातही हिच स्थिती आहे. ‘आमचीच संघटना अधिकृत व मान्यताप्राप्त’ असा दावा दोन्ही संघटनांकडून केला जातोय. त्यामुळे खेळाडूंची चांगलीच पंचाईत झाली आहे. सांगलीतील गुणवंत खेळाडू खेळातील राजकारणात भरडले जात आहेत. त्यातीलच एक ‘भगीरथ शाम राठोड’... शरीरसौष्ठवमधील डझनभर मानाच्या किताबाचा मानकरी. सांगलीचा आघाडीचा शरीरसौष्ठवपटू. स्वभाव सडेतोड, मात्र दिलाचा राजा माणूस. दिवसरात्र मेहनत करूनही भगीरथच्या नशिबी उपेक्षाच. शरीरसौष्ठवमध्ये जेवढ्या वेगाने भगीरथचा ‘सेन्सेक्स’ वर गेला तेवढ्याच वेगाने तो खालीही आला. निराश न होता प्रस्थापितांच्या टीका टोमण्यांचे ‘सप्लीमेंट’ पचवत भगीरथ मेहनत करत राहिला. आता तर ‘महाराष्ट्र श्री’ किताबाला गवसणी घालण्याचं बळ भगीरथनं एकवटलं आहे. रस्त्यावर मसाला विकून उदरनिर्वाह करणारी आई आणि बालपणीच हरपलेले पितृछत्र ही भगीरथची ‘फॅमिली बॅगराऊंड’. सर्टिफाईड ट्रेनर आणि स्पोर्टस् जनरल न्युट्रीशियन्स म्हणून काम करून भगीरथ आपली रोजीरोटी कमावतोय. शरीरसौष्ठवला ‘देव’ मानणाऱ्या भगीरथवर ‘देवा तुला शोधू कुठे’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्पर्धांमधील वशिलेबाजीमुळे जिल्ह्याचा हा गुणी खेळाडू इतर जिल्ह्यांकडून स्पर्धा खेळण्याच्या वाटेवर आहे. ही तर भगीरथची शॉर्ट स्टोरी आहे. असे अनेक भगीरथ सांगलीच्या मातीत लपले आहेत. अन्यायाला कंटाळून काहींनी खेळ सोडला, तर काहीजण खासगी व्यायामशाळेत चार-पाच हजारांवर राबत आहेत. १९९५ नंतर जिल्ह्याला एकदाही ‘महाराष्ट्र श्री’ किताब मिळाला नाही. खेळाडूंची पात्रता असूनही तो का मिळत नाही? की मिळूच दिला जात नाही? याचं शरीरसौष्ठवचे ‘तारणहार’ म्हणवणाऱ्यांना काहीच देणं-घेणं नाही. स्पर्धांचा सर्रास प्रसिध्दीसाठी वापर होत आहे. हीच स्थिती कायम राहिली, तर जिल्ह्यातील शरीरसौष्ठव खेळ संपायला वेळ लागणार नाही. भगीरथनं मिळवलेले किताब...भीमसेन सँण्डो श्री, सांगली श्री, पेठभाग श्री, बालगणेश श्री, आरग सरपंच श्री, बेडग सरपंच श्री, अंबाबाई श्री, बिसूर श्री, भिलवडी श्री, जयहिंद श्री, तारदाळ श्री, इस्लामपूर श्री‘लोकमत’ आयोजित राज्यस्तरीय जवाहरलाल दर्डा श्री स्पर्धा (यवतमाळ) : रौप्यपदकमहाराष्ट्र श्री स्पर्धा (पिंपचरी-चिंचवड) : ७० किलो वजनी गटात कास्यपदकज्युनिअर भारत श्री स्पर्धा, खम्माम (हैदराबाद) : ७० किलोत सुवर्णपदकराष्ट्रीय स्पर्धा, गोकाक (कर्नाटक) : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वमी खरे बोलतो, सडेतोड बोलतो म्हणूनच मला अनेकांचा रोष ओढावून घ्यावा लागला. दिवसभर डोक्यात फक्त शरीरसौष्ठवच असते. संघटनांमधील वादामुळे खुप नुकसान झाले. डोक्यावर अडीच लाखाचे कर्ज आहे. जो तो स्वत:चा स्वार्थ बघतो. खुप मेहनत करतोय तरीही खेळातील राजकारणामुळे पाय ओढले जातात. पात्रता असूनही स्पर्धेत खेळू शकत नाही. - भगीरथ राठोड , (राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू)