शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:30 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

ठळक मुद्देकाँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरीजिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी २५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

सांगली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शुक्रवारी कॉँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापूर्वी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस कमिटीमध्ये पार पडल्या. राज्याच्या प्रभारी सोनल पटेल, जिल्हा निरीक्षक, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम, चिटणीस अलका राठोड, जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मुलाखतीस ते गैरहजर राहिले, माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी उमेदवारीही मागितली नाही, शिवाय मुलाखतीसाठीही ते गैरहजर होते. पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक ११ इच्छुक मिरज मतदारसंघात आहेत.सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जयश्रीताई पाटील मुलाखतीवेळी पक्षाच्या विविध सेलसह महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही मुलाखत दिली. शहरात कॉँग्रेसचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.भाजप सरकारविरोधात अनेक आंदोलने केली असून त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून राजाराम देशमुख यांनी उमेदवारी मागितली. अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्या कार्यपध्दतीवर काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली. जतमधून विक्रम सावंत यांनी उमेदवारी मागितली. मुलाखतीनंतर इच्छुक उमेदवारांचा अहवाल प्रदेश कॉँग्रेस कमिटीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली