शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 18:05 IST

शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. 

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोलपवारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपपवारांच्या आत्मचरित्रात शेतकरी कायद्यातीलच गोष्टी नमूद असल्याचं सदाभाऊ म्हणाले.

सांगली"शरद पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल", अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन करतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. 

"पवार साहेबांचं काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करतात. त्यांनी जर म्हटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असं म्हटलंय. पण दुसरीकडे पवार म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय", असं सदाभाऊ खोत म्हणाले. 

नव्या कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजावून सांगण्यासाठी देशभरात भाजपच्या वतीने किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. आज सांगलीत या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपा