शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सांगली जिल्हा परिषदेत रयत विकास आघाडीच्या हाती सत्तांतराचे दोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 15:17 IST

स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आधीच भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांचाही एक सदस्य आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेली आहे.

ठळक मुद्देसत्यजित देशमुख भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या गटाचे दोन सदस्य भाजपमध्ये असे ठरविले, तर २७ सदस्य होतील.

सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता शिवसेना, अजितराव घोरपडे गट, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष यांच्या टेकूवर टिकून आहे. मित्रपक्षांना सव्वा वर्षानंतर सभापतिपदाची संधी देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्यामुळे मित्रपक्षांचे नेते भाजपवर नाराज आहेत. विशेषत: रयत विकास आघाडीतील महाडिक गट आणि सी. बी. पाटील गट नाराज असल्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला सुरुंग लावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने कमळ फुलविले. पण, आता महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाराष्टÑ विकास आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीमुळे राज्यातील राजकारणावर परिणाम होणार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेमधून भाजपला दूर व्हावे लागणार आहे.जिल्हा परिषदेत ६५ वर्षात प्रथमच भाजपचे कमळ फुलले होते. मात्र अडीच वर्षात भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत फसविल्याचा आरोप मित्रपक्षांचे नेते करीत आहेत. त्याचा फटका भाजपला बसेल, असे चित्र आहे. जिल्हा परिषदेत ६० पैकी तीन जागा रिक्त झाल्या आहेत.

सध्या भाजप २३, काँग्रेस ९, राष्ट्रवादी १३, शिवसेना ३, रयत विकास आघाडी ४, स्वाभिमानी पक्ष १, विकास आघाडी (घोरपडे गट) २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसचे शिराळा तालुक्यातील कोकरुड जिल्हा परिषद गटाचे सदस्य सत्यजित देशमुख यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सावळज (ता. तासगाव) जिल्हा परिषद गटाचे चंद्रकांत पाटील यांचे निधन झाले आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निकालाचाही सत्तेवर परिणाम होणार आहे.

काँग्रेसच्या पणुंब्रे वारुणच्या सदस्या शारदा हणमंत पाटील यांचीही, भाजप की काँग्रेस, अशी द्विधा मनस्थिती आहे. उमदी (ता. जत) गटाचे सदस्य विक्रम सावंत आमदार झाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परंतु, या जागेवर निवडणूक जाहीर झाली नसल्यामुळे ती रिक्तच राहणार आहे. पदाधिकारी बदलावेळी ५९ सदस्यच मतदान करणार आहेत. त्यावेळी काँग्रेसकडे खात्रीशीर सात सदस्य असतील.

राष्ट्रवादीकडे सध्या १३ सदस्यसंख्या आहे. सावळज पोटनिवडणुकीतील निकालानंतर त्यांची संख्या १३ की १४ हे ठरणार आहे. सत्तेसाठी ३० सदस्यांची गरज आहे. भाजपकडे सध्या स्वत:चे २३, मित्रपक्ष रयत विकास आघाडीचे चार, शिवसेना तीन, स्वाभिमानी विकास आघाडी दोन, स्वाभिमानी पक्ष व अपक्ष प्रत्येकी एक, अशी ३४ सदस्यसंख्या आहे. सव्वावर्षात बदल करून सत्तेचा वाटा दिला नसल्याने रयत विकास आघाडीतील महाडिक गटव सी. बी. पाटील गट नाराज आहे. तीच परिस्थिती माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या स्वाभिमानी विकास आघाडीची आहे. त्यांचेही दोन सदस्य आहेत. स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आधीच भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांचाही एक सदस्य आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेतही शिवसेना नेत्यांना आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाचे तीन सदस्य आहेत. भाजपकडील ३४ सदस्यांपैकी मित्रपक्षांच्या दहा सदस्यांची संख्या घटणार आहे. मात्र अपक्ष ब्रह्मदेव पडळकर, प्रमोद शेंडगे यांच्यामुळे २५ सदस्यसंख्या राहील. सत्यजित देशमुख भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या गटाचे दोन सदस्य भाजपमध्ये असे ठरविले, तर २७ सदस्य होतील. रयत विकास आघाडीतील नायकवडी गट विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे या रयत आघाडीच्या सर्वच सदस्यांना घेतल्याशिवाय भाजपचे गणित जुळणार नाही. सत्तेची दोरी आता रयत विकास आघाडीतील नेते सी. बी. पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांच्या हातामध्ये आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण