शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट

By शीतल पाटील | Updated: February 28, 2023 16:42 IST

काही दिवस पुरेल एवढे पाणी नदीपात्रात शिल्लक

सांगली : सांगली व कुपवाड शहरातील साडेचार लाख लोकसंख्येला पाणी पुरविणारी कृष्णा नदी कोरडी पडू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत नदीपात्रातीलपाणी साठा कमी झाल्याने महपाालिके्च्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला असून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.सांगली, कुपवाडसह नदी काठच्या गावांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी कृष्णेतून उचलले जाते. त्याचा उपसा होत राहिल्याने नदीने तळ गाठला. आता काही दिवस पुरेल एवढे पाणी नदीपात्रात शिल्लक राहिले आहे. महापालिकेकडून सांगली व कुपवाड या दोन शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीने तळ गाठल्याने महापालिकेला अपेक्षित पाणी उचलताना मर्यादा येत आहेत. नदीतील इंटकवेल येथेही पाण्याची पातळी कमी झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली.परिणामी शहरातील अनेक भागाला अपेक्षित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. पाटबंधारे विभागानेही पाण्याचे नियोजन सुरू असून बुधवारपर्यंत पाणी पोहचेल, अशी शक्यता वर्तविली आहे.आता तरी जागे व्हाउन्हाळ्यात कृष्णा नदी वारंवार कोरडी पडते. शिवाय नदीप्रदुषणही वाढले आहे. त्यासाठी सांगलीकरांना वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्याची योजना मदनभाऊ पाटील यांनी आखली होती. पण महापालिकेने या योजनेची अंमलबजावणी केली नाही. आता तरी जागे होऊन वारणा पाणी योजनेसाठी आमदार, खासदार, महापालिकेने पाठपुरावा करावा, असे आवाहन युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी