रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

By Admin | Updated: September 1, 2014 23:57 IST2014-09-01T22:11:19+5:302014-09-01T23:57:51+5:30

महावितरणचे दुर्लक्ष : ३0 वर्षांत गेला ६ जणांचा बळी

Rift Rowdhury, Dharmalwadikarara electric wardrobe! | रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

मानाजी धुमाळ -रेठरेधरण -रेठरेधरण, धुमाळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांना जणू विद्युततारांचा शाप असून, गेल्या ३0 वर्षात ६ जणांचा बळी गेला आहे.रेठरेधरण, धुमाळवाडी परिसरातून २६0 व्होल्ट व ४६0 व्होल्टच्या विद्युततारांचे जाळे विणले असून धुमाळवाडी परिसरातून विद्युत वितरणचे मोठे टॉवर आहेत. त्यातच विद्युत वितरण तारा या धोकादायक असल्याने जमिनीपासून किमान २0 फूट उंचीवर असणे गरजेचे असताना, वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्याने, झाडे पडून तारांचा ताण ढिला झाल्याने तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर झुकलेल्या असतात. काही ठिकाणी तर तारा तुटून पडतात. या तारांचा शॉक बसून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.
१९९0 च्या दरम्यान धुमाळवाडी डोंगरावर मोठ्या टॉवरच्या तारा जमिनीपासून पंधरा फुटावर होत्या. त्यावेळी शाळकरी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय जाधव (वय १३) व प्रताप सखाराम धुमाळ (१३) यांनी खेळण्याच्या नादात तारेवर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे तारेजवळ मोठा स्फोट होऊन त्यांना भाजल्याने या दोन्ही मुलांना प्राण गमवावा लागला होता.
१९८0 च्या दशकात रेठरेधरण येथील लेंढूरी ओढ्यानजीक असणाऱ्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग चंद्रू पाटील यांचा मृत्यू झाला होता. तसेच रेठरेधरण-शिराळा रोडनजीक असलेल्या डी. पी.ची दुरुस्ती करण्यासाठी पोलवर चढलेले वायरमन जमादार यांना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
२00२ मध्ये सर्जेराव रंगराव पाटील या शेतकऱ्याचा शेतातील उसात तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता, तर असाच प्रकार ४ आॅगस्ट २0१४ रोजी घडला. यामध्ये सांगलीच्या अग्निशमन दलातील कर्मचारी तुकाराम उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उठत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज...
आतापर्यंत रेठरेधरण व धुमाळवाडी या दोन गावातील ६ जणांना शॉक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व घटना अंगावर शहारा आणणाऱ्या असून, वीज वितरण कंपनीने यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तारा खाली लोंबकळत आहेत, त्यांचा वेळीच ताण काढणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतातून तारा गेल्या आहेत, तेथील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

Web Title: Rift Rowdhury, Dharmalwadikarara electric wardrobe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.