शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जबाबदार लाेकप्रतिनिधींकडून लाेकशाही व्यवस्थेची खिल्ली - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:01 IST

काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी करताना शरम वाटायला पाहिजे होती

वाळवा : काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी म्हणजे जबाबदार लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची उडवलेली खिल्ली आहे. अशी वक्तव्ये करताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती. भारतीय लोकशाहीत मनमानीला स्थान नाही. पण आज सरकारकडून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत केवळ मनमानी कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू लेखक, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केले.

वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के. जी. पाटील, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराव, वैभव नायकवडी, प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, प्राचार्य आर. एस. चोपडे, ॲड. सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधी म्हणाले, राम मंदिराच्या भावनिक विषयावर सत्ताबदल घडवून आणण्यात आला. यामुळे आजच्या राज्यकर्त्यांना राष्ट्र, राज्य व जनतेच्या हिताचे सोयरसुतक नाही. यामुळे समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता येत आहे. हे राेखण्यासाठी महाराष्ट्रात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिसरकारची पुन्हा एकदा गरज आहे. न्याय व समता यासाठी लढणाऱ्यांना आज एकामागून एक संपवले जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकशाहीत राजद्रोह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशद्रोह आणि राजद्रोह हे पूर्णतः वेगळे आहे. मात्र याबाबत जनतेमध्ये भीती पसरवली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगली