शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जबाबदार लाेकप्रतिनिधींकडून लाेकशाही व्यवस्थेची खिल्ली - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:01 IST

काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी करताना शरम वाटायला पाहिजे होती

वाळवा : काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी म्हणजे जबाबदार लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची उडवलेली खिल्ली आहे. अशी वक्तव्ये करताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती. भारतीय लोकशाहीत मनमानीला स्थान नाही. पण आज सरकारकडून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत केवळ मनमानी कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू लेखक, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केले.

वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के. जी. पाटील, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराव, वैभव नायकवडी, प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, प्राचार्य आर. एस. चोपडे, ॲड. सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधी म्हणाले, राम मंदिराच्या भावनिक विषयावर सत्ताबदल घडवून आणण्यात आला. यामुळे आजच्या राज्यकर्त्यांना राष्ट्र, राज्य व जनतेच्या हिताचे सोयरसुतक नाही. यामुळे समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता येत आहे. हे राेखण्यासाठी महाराष्ट्रात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिसरकारची पुन्हा एकदा गरज आहे. न्याय व समता यासाठी लढणाऱ्यांना आज एकामागून एक संपवले जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकशाहीत राजद्रोह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशद्रोह आणि राजद्रोह हे पूर्णतः वेगळे आहे. मात्र याबाबत जनतेमध्ये भीती पसरवली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगली