शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

जबाबदार लाेकप्रतिनिधींकडून लाेकशाही व्यवस्थेची खिल्ली - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:01 IST

काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी करताना शरम वाटायला पाहिजे होती

वाळवा : काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी म्हणजे जबाबदार लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची उडवलेली खिल्ली आहे. अशी वक्तव्ये करताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती. भारतीय लोकशाहीत मनमानीला स्थान नाही. पण आज सरकारकडून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत केवळ मनमानी कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू लेखक, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केले.

वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के. जी. पाटील, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराव, वैभव नायकवडी, प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, प्राचार्य आर. एस. चोपडे, ॲड. सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधी म्हणाले, राम मंदिराच्या भावनिक विषयावर सत्ताबदल घडवून आणण्यात आला. यामुळे आजच्या राज्यकर्त्यांना राष्ट्र, राज्य व जनतेच्या हिताचे सोयरसुतक नाही. यामुळे समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता येत आहे. हे राेखण्यासाठी महाराष्ट्रात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिसरकारची पुन्हा एकदा गरज आहे. न्याय व समता यासाठी लढणाऱ्यांना आज एकामागून एक संपवले जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकशाहीत राजद्रोह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशद्रोह आणि राजद्रोह हे पूर्णतः वेगळे आहे. मात्र याबाबत जनतेमध्ये भीती पसरवली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगली