शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिराळा तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकास खोडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:37 IST

शिराळा तालुक्यात यावर्षी पावसाने उच्चांक नोंदवला. ऊस पिकाबरोबरच भात या खरीप पिकाची अपरिमित हानी झाली. अवकाळीने उरल्यासुरल्या धान्याची नासाडी झाली. भातापासून वैरण म्हणून मिळणारे पिंजर वाया गेले. शेतकºयांना दुहेरी फटका बसला

ठळक मुद्देदुबार भातास लोंब्या : भातासह वैरण शेतक-यांच्या पदरात पडणार

सहदेव खोत  ।पुनवत : शिराळा तालुक्यात यंदा अति पावसाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. खरीप हंगामात हानी झालेल्या भात पिकाच्या कापणीनंतर शेतातील ओलीमुळे भात पिकाचे खोडवे आलेले पाहावयास मिळत आहे. या दुबार भाताला लोंब्याही आल्या आहेत. त्यामुळे भाताबरोबरच वैरणही शेतकºयांच्या पदरात पडणार आहे. परंतु पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही.

शिराळा तालुक्यात यावर्षी पावसाने उच्चांक नोंदवला. ऊस पिकाबरोबरच भात या खरीप पिकाची अपरिमित हानी झाली. अवकाळीने उरल्यासुरल्या धान्याची नासाडी झाली. भातापासून वैरण म्हणून मिळणारे पिंजर वाया गेले. शेतकºयांना दुहेरी फटका बसला. नोव्हेंबर उजाडेपर्यंत पाऊस पडल्याने काढणी करणे अवघड झाले. काढणीनंतर शेतात ओल कायम राहिल्याने अनेक ठिकाणच्या भातवाफ्यात खोडवा पीक उगवून आले आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडल्याने अनेक शेतक-यांनी भाताचे खोडवे तसेच राखले आहेत. भात आणि पिंजर फायद्यात पडेल म्हणून काहींनी खताची मात्रा दिली आहे.

अनेक ठिकाणी खोडवा भात नजरेस पडत आहे. दुबार पीक पोसवले आहे. त्यामुळे अशा शेतात काही तरी पदरात पडेल, अशी शेतकºयांना आशा आहे. परंतु अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही. त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.

रब्बी हंगामात साधारण नोव्हेंबरच्या मध्यावर गहू, मका या पिकांची पेरणी होते. पेरणी वेळेत झाली तर ही पिके साधतात. पण यंदा हा काळ पुढे गेल्याने ही पिके आता यापुढे कितपत फायदेशीर ठरणार, ही चिंता सतावू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस