‘तिळगंगा’चे पुनरुज्जीवन लोकसहभागातूनच पूर्ण

By Admin | Updated: September 9, 2016 01:12 IST2016-09-09T00:13:24+5:302016-09-09T01:12:42+5:30

राजू शेट्टी : परिसरातील पाणी प्रश्न सुटणार, नदीतील पाण्याचे पूजन

The revival of Tilganga is complete from the people's participation | ‘तिळगंगा’चे पुनरुज्जीवन लोकसहभागातूनच पूर्ण

‘तिळगंगा’चे पुनरुज्जीवन लोकसहभागातूनच पूर्ण

पेठ : शासनाकडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पेठ येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही शासनाने मोठी मदत केली आहे. तसेच याला लोकसहभागाची साथ मिळाल्याने कमी कालावधित लाखमोलाचे काम झाले आहे. तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे भविष्यातील पाणी टंचाई मिटली आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीतील पाण्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, नायब तहसीलदार शैलजा पाटील, सरपंच श्रीमती सुनीता पवार, संपतराव पवार, प्रा. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, जलशिवार योजनेंतर्गत ग्रामप्रकाश शिवराज्य संस्थेच्या माध्यमातून तिळगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. आगामी काळात ही नदी बारमाही वाहू लागेल.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार आहे.
प्रारंभी पं. स. सदस्य प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, अ‍ॅड. एस. यु. संदे, डॉ. सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यशवंत ग्लुकोजचे संचालक संदीप पाटील, शांताराम देशमाने, विलास चौथाई, मंडल अधिकारी गोपी वडर, तलाठी टी. आर. काळे, नीता भोसले, राहुल पाटील, शेख, विलास पाटील, श्रीरंग कदम, रमेश कदम, धुळाप्पा जानकर उपस्थित होते. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)

समन्वय : कृतीचा
शासन, लोकसहभाग, प्रशासन यांच्यातील समन्वयामुळेच आपण कितीही मोठे काम सहजपणे करू शकतो, हेच तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवन कामावरून स्पष्ट झाले आहे. यापुढेही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.

Web Title: The revival of Tilganga is complete from the people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.