शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

अवसायनातील अष्टलिंग पतसंस्थेच्या ठेवी परत : १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 9:26 PM

सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठेवीदार बचाव समिती यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. २३ वर्षात ठेवीदारांना सुमारे दहा ...

ठळक मुद्दे२३ वर्षात १० कोटी व्याजासह परत; राज्यातील एकमेव उदाहरण

सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठेवीदार बचाव समिती यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. २३ वर्षात ठेवीदारांना सुमारे दहा कोटीच्या ठेवी परत करण्यात आल्या. सुमारे २७ लाखांचा शेवटचा हप्ता नुकताच ठेवीदारांना देण्यात आला.१९९५ मध्ये आष्ट्याच्या अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक व कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींचा अपहार केला. ठेवीदारांनी ठेवींसाठी तीव्र आंदोलन केले. शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले व प्रशासक मंडळ नेमले. २००१ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. मात्र नूतन संचालक अपहारकर्त्या संचालकांना मदत करीत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी राजीनामा दिला

२००२ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यांनी मृत ठेवीदारांचे खोटे अंगठे उठवून पैसे हडप केल्याचे सिद्ध झाले. याप्रश्नी ठेवीदारांनी ८३ दिवस ठिय्या आंदोलन केले होते. अखेर ३० सप्टेंबर २००३ रोजी संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी संस्था अवसायनात काढली व अवसायक म्हणून वर्ग एकच्या अधिकाºयाची नियुक्ती केली. त्यांनीही कर्जदारांना बेकायदेशीर सूट दिल्याने पुन्हा वाद झाला. पुढे अवसायकांची बदली करण्यात आली.सहायक रजिस्ट्रार इस्लामपूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करून अष्टलिंग बचाव समितीचा एक प्रतिनिधी अवसायक मदतनीस म्हणून नेमण्यात आला. पण राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीवर मर्यादा येऊ लागल्या.

अखेर जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेवर अवसायक मंडळ नेमले. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहायक उपनिबंधक इस्लामपूर सचिन गायकवाड यांची, तर अष्टलिंग बचाव समितीचे अमोल पाटील, राजाराम पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.१९९५ पासून दहा कोटीच्या ठेवी परत करण्यात अवसायकांना यश आले.जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड, पाटील, पवार यांनी ठेवीदारांना ठेवी पुन्हा मिळवून दिल्या.* १९९५ मध्ये अष्टलिंग पतसंस्थेत संचालक मंडळ व कर्मचाºयांकडून अडीच कोटीचा अपहार.* अवसायक मंडळ, ठेवीदार बचाव समिती, सदस्य कर्जदाराच्या दारात बसून पैसे वसूल करीत असत. हे पैसे प्रत्येक ठेवीदारास गुढीपाडवा व दिवाळीस आठ दिवस अगोदर संस्थेसमोर फलक लावून परत केले जात.* १९९५ मध्ये बंद पडलेल्या संस्थेत ३९ लाखांचा तोटा होता. अवसायक मंडळाने तो भरून काढत संस्था १० लाख नफ्यात आणली.* सर्व ठेवीदारांना संपूर्ण मुद्दल व अवसायन तारखेपर्यंत संपूर्ण व्याज परत करण्यात आले.* विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, तत्कालीन जिल्हा निबंधक प्रकाश अष्टेकर, अवसायक मंडळ अध्यक्ष अमोल डफळे, सदस्य शिवाजी पाटील, राजाराम पवार यांचे यासाठी सहकार्य.

 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी