शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

दुष्काळग्रस्तांचं जीणं ‘फेसाटी’त मांडलं: नवनाथ गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:17 AM

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील ...

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारतीच्या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे या दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. गोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, जि. प. सदस्य सरदार पाटील, रा. स. प. अध्यक्ष अजित पाटील, मराठी-कन्नड साहित्य परिषदेचे डॉ. रवींद्र आरळी, डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित होते.मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की, शाळेमध्ये शिकवत असताना लहान मुलांसमोर आदर्श उभे करण्यासाठी मी लिहित गेलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी यशाचे शिखर गाठले, त्यांच्यावर लिहित गेलो आणि त्यातीलच एक कथा आठवीच्या बाल भारती या पुस्तकात समाविष्ट झाली. त्यामुळे लिखाणाची प्रेरणा वाढली.प्राचार्य डॉ. ढेकळे यांच्याहस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारती या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सत्कार केला.यावेळी डॉ. श्रीकांत कोकरे यांनी गोरे व ऐनापुरे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनाचा धगधगता प्रवास प्रेक्षकांसमोर उभा केला. मराठी विभागप्रमुख प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कुमार इंगळे यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. सागर सन्नके यांनी आभार मानले.जत तालुक्याच्या वैभवात भरडॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले की, जीवनामध्ये अनेक संकटे येतात. त्या संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य पुस्तकामध्ये असते. विचारांची एकरूपता आणि सामाजिक संवेदनशीलता एकत्र आले की नवीन साहित्य जन्माला येते. ‘फेसाटी’ कादंबरीस साहित्य अकादमीसारखा मोठा पुरस्कार प्राप्त झाला, ही जतच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे.