शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:43 IST

जयश्रीताईंनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात 

सांगली : मी आमदार झालो तर पुढील निवडणूक न लढविण्याबाबत पाचशेच्या बाँडवर वचन तसेच शहराध्यक्षपदाचा राजीनामा अशा दोन अटी मला घातल्या गेल्या. त्या पूर्ण केल्या तर जयश्रीताई पाटील अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात आले. राजीनामा व बाँड दोन्हीही तयार होते; तरीही त्यांनी बंडखोरी का केली, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीवाडी येथील सभेत उपस्थित केला.सांगलीवाडीच्या चौकात काँग्रेसची प्रचारसभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताईंनी अर्ज मागे घ्यावा म्हणून मी स्वत: दोन वेळा त्यांना भेटलो. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मला त्यांनी ज्या दोन अटी घातल्या होत्या, त्या मान्य केल्या.राजीनामापत्र व पाचशे रुपयांचा बाँड तयार ठेवला होता. त्याची कल्पना देऊनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्या या बंडखोरीमागे नेमके कोण आहे, याचा तपास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जरूर घ्यावा. त्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराज पाटील यांचा हे त्यांनी सांगावे.माझ्याबरोबर जाऊ नये म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आला. सांगलीवाडीतील बहुतांश माजी नगरसेवकांनी हा दबाव झिडकारून मला साथ दिली. लोकांनी ठरविले तर कोणाचे काही चालत नाही. नागरिकांनी विश्वास दिल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे, असे पाटील म्हणाले.

त्यांनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज की जयश्रीताई असा पेच आमच्यासमोर होता. दोन्हीही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, मागील पाच वर्षांत पृथ्वीराज पाटील यांनी जे काम केले त्याची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ तसेच शेवटी विधान परिषद सदस्यत्व देण्याचेही वचनही जयश्रीताईंना दिले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करायला नको होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024